जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे दांपत्याने मुंबईतील चांगली नोकरी सोडून काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. उद्योगाचा तंत्रशुद्ध अभ्यास व गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर दिला. वीस कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पातून प्रतिमहिना सुमारे ७५ टन काजू प्रक्रिया क्षमता तयार केली. सुमारे ३२ ग्रेडचा काजू तयार करीत देशाची बाजारपेठ मिळविली. यंदा १७ टनांची अमेरिकेत थेट निर्यात करण्यापर्यंतची भरारी परांजपे दांपत्याने घेतली आहे. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आडीवरे येथील हृषीकेश परांजपे यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने हृषीकेश यांचे शिक्षण मुंबई-कल्याण येथे झाले. दहावीत असताना कॅलेंडर विक्रीपासून त्यांनी आपल्यातील मार्केटिंग कौशल्य अजमावले. फ्लॉपी, सीडी विकल्या. महाविद्यालयीन जीवनातही संगणकाची कामे करून दिली. सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीत ‘फायनान्स’ विभागात नोकरीही मिळाली. त्यानिमित्ताने कॅनडात गेले असता काजूचे मार्केट पाहण्यास मिळाले. त्या वेळी काजू उद्योगाचे महत्त्व लक्षात आले. विविध देशांतही काजूला मागणी असल्याचे लक्षात आले. उद्योगाचा सूक्ष्म अभ्यास केला. सन २००९ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन ते आडीवरे या मूळ गावी परतले. इथेच त्यांच्या काजू व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कंपनीची स्थापना
परांजपे यांचा उद्योग दृष्टिक्षेपात क्षमता व मनुष्यबळ
बाजारपेठ
वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता
काजू प्रक्रियेतील मुख्य टप्पे
थेट अमेरिका निर्यातीचे स्वप्न प्रत्यक्षात देशभरातील मार्केट मिळविल्यानंतर परदेशी निर्यातीकडे परांजपे यांनी पावले उचलली. स्वतःच्या उद्योगाची वेबसाइट तयार केली. त्यातून अमेरिकेतील एका कंपनीकडून काजूची मागणी आली. त्यांनी नमुन्यादाखल काजू पाठविण्यास सांगितला. मग पुढील प्रयत्न सुरू केले. केरळ येथील कार्यालयाशी संपर्क साधला. दर्जा, काजू कीडमुक्त करण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यात बराचसा कालावधी गेला. अखेर पहिल्या टप्प्यात १४ टन, तर दुसऱ्या टप्प्यात ५ टन असा १९ टन काजू अमेरिकेत कोणत्यही मध्यस्थाशिवाय थेट कंपनीला पाठविण्यात परांजपे दांपत्य यशस्वी झाले. निर्यातीने वाढविला कोकणचा मान परदेशी मानकांनुसार परिपूर्ण आणि दर्जेदार काजू तयार करण्याचे आव्हान परांजपे यांनी यशस्वी करून दाखविले. काजू कीडमुक्त असावा, यासाठी फ्युमिगेशन प्रक्रियाही केली. पॅकबंद केलेला काजू यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील न्हावाशेवा बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झाला. ‘कन्साइनमेंट’ पोचण्यासाठी सुमारे २४ ते ३० दिवस लागतात. कंटेनरच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस प्रणालीसह इलेक्ट्रॉनिक्स लॉक सिस्टम वापरण्यात येते. निर्यातीचा हा मान मिळालेल्या परांजपे यांनी आपला आनंद जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला. कोकणातील काजू थेट अमेरिकेला आतापर्यंत निर्यात झालेला नसावा. बहुतांश काजू व्यापारी वा निर्यातदारांमार्फतच परदेशात जातो. काजू प्रक्रिया उद्योगातील समस्या
सरकारचे पाठबळ हवे परांजपे सांगतात की, बारमाही उत्पादन सुरू असेल तर परदेशात निर्यात करणे शक्य होते. व्हिएतनाम आघाडीचा काजू उत्पादक देश आहे. तिथे व्यावसायिकांना सरकारचे पाठबळ मिळते. याउलट भारतामध्ये काजूकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे हा उद्योग छोट्या प्रक्रियेपुरताच मर्यादित राहिला आहे. पुरस्कार - ‘सह्याद्री’ वाहिनीकडून ‘ग्रामीण प्रक्रिया उद्योजक’ पुरस्कार परांजपे दांपत्याला नुकताच प्रदान करण्यात आला. काजू टरफलापासून ऑइलनिर्मिती केवळ काजू प्रक्रियेवर न थांबता परांजपे यांनी काजू बीच्या वाया जाणाऱ्या सालींपासून ऑइलनिर्मिती उद्योगही सुरू केला आहे. त्याला बाजारपेठही मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. संपर्क- हृषीकेश परांजपे - ९८३३६४१६६० समृद्धी परांजपे - ९८१९९५३३७३
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.