शेतकरी ः एकनाथराव साळवे सिंगणापूर (ता. जि. परभणी) सिंगणापूर (ता. जि. परभणी) शिवारामध्ये साळवे कुटुंबाची ९० एकर शेती आहे. सिंचनासाठी आठ विहिरी अाहेत. सव्वा कोटी आणि सव्वा दोन कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता असलेल्या दोन शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण केली आहे. त्यांनी संपूर्ण शेती स्वंयचलित संगणकीय ठिबक सिंचन प्रणालीद्वारे ओलिताखाली आणली आहे.
ऊस, केळी, हळद, आले यासह अन्नधान्य, फळपिके तसेच कांदा बीजोत्पादन घेतले जाते. सध्या साळवे यांच्याकडे ३० एकर ऊस, ६ एकर केळी, २ एकर लिंबू, ४ एकर हळद, ५ एकर आले, ४ एकर सीताफळ, ५ एकर डाळिंब, २ एकर ज्वारी, २ एकर गहू, २ एकर टोमॅटो, २ एकर चारा पिकांची लागवड केलेली आहे. उपलब्ध पाण्याचा काटेकोर अाणि कार्यक्षमरीत्या वापर होण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने संपूर्ण ९० एकर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. पारंपरिक पाटपाणी पद्धतीने केवळ आठ तास मिळणाऱ्या वीजपुरवठ्यावर ९० एकर क्षेत्र ओलिताखाली आणणे शक्य झाले नसते. त्यामुळे प्रवाही पाण्याची पद्धत पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या सात वर्षापासून सर्व पिकांना गरजेनुसार पाणी देण्यासाठी शेतावर स्वयंचलित संगणक प्रणाली कार्यान्वित केली. पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार संगणकावर प्रोग्रॅम फीड केला जातो. त्यामुळे पिकांना वेळेच्या वेळी अाणि मोजून गरजेएवढे पाणी मिळते. मार्चनंतर विहिरींमधील पाणी कमी होत जाते. त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाच्या योजनेतून शेततळ्यांची उभारणी केली आहे. विहिरींमध्ये पाण्याची आवक सुरू असते तोपर्यंत विद्युत पंपाने विहिरीतील पाणी उपसून दोन्ही शेततळी भरून घेतली जातात.यामुळे पिकांना संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण बसत नाही. गेल्या काही वर्षापासून वर्षाआड आमच्या भागात दुष्काळ पडत आहे. अवर्षणाच्या स्थितीत सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे शेततळ्यांतील संरक्षित पाण्याचा काटेकोरपणे वापर करत उत्पादन घेत आहोत. संपर्क ः एकनाथराव साळवे ः ९८६०७९१८५८