पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावरील काळेवाडी या दुष्काळी गावातील देवराम काळे यांनी पेरू पिकातील तज्ज्ञ शेतकरी अशी ओळख मिळवली आहे. सीताफळ, अंजीर व डाळिंबाची जोड देत आपली १२ एकर शेती फळबाग केंद्रित बनवून अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. एक एकर पॉलीहाऊसमध्ये कार्नेशन घेत बहुविध पिकांद्वारे प्रयोगशीलता, सातत्य, चिकाटी, जोखीम घेण्याची वृत्ती, तंत्रज्ञान आत्मसात करणे आदी गुणांचा वापर करून स्वतःचे वैशिष्ट्य जपले आहे.
पुरंदर (जि. पुणे) तालुक्यातील काळेवाडी गावची साधारणपणे बाराशेच्या आसपास लोकसंख्या आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गेल्यावर्षी तर अत्यल्प पाऊस पडला. गावातील प्रयोगशील शेतकरी देवराम काळे यांची ११ एकर फळबाग केंद्रित शेती आहे. न खचता दुष्काळी परिस्थितीवर मात करून कमी पाण्यात शेती प्रगत करण्याची इच्छाशक्ती त्यांनी जपली आहे. कृषी सहायक अनिल पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी त्यांना सहकार्य करतात. कमी पाण्यात पीक नियोजन
शेततळ्याची उभारणी गावात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती असल्याने फळपिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. काही वेळेस बागा सुकूनही जातात. समस्येतून मार्ग काढण्यासाठी चार शेततळी घेतली आहेत. त्यासाठी एक एकर क्षेत्र गुंतवले आहे. सुमारे ९५ लाख लीटर पाणी साठवण्याची क्षमता तयार केली आहे. दोन विहीर, दोन बोअरवेल्स जोडीला आहेत. संरक्षित शेतीचा अवलंब
उत्पादन व उत्पन्न
सक्रिय गट गावात विविध योजना राबविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी आत्मा अंतर्गत श्रीराम समूह शेतकरी गटाची स्थापना झाली आहे. यात वीस शेतकऱ्यांचा सहभाग आहे. यात काळेही सहभागी झाले आहेत. गटाच्या माध्यमातून माती परिक्षण, फळप्रक्रिया, सेंद्रिय शेती, गांडूळ खते अशा विविध विषयांवर मार्गदर्शन मिळते. प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल दोन वर्षांपूर्वी पॅकहाऊसची उभारणी केली आहे. गावात शेतकरी गटामार्फत प्रक्रिया उद्योग सुरू झाला आहे. काळे देखील त्याचा लाभ घेतात. त्यांनी आपल्या आंब्यावर प्रक्रिया करून तीन टन पल्प निर्मिती केली. सीताफळापासून १३ टन गर उत्पादित करून १० टनांपर्यंत विक्री केली. विविध कार्यक्रम व लग्न समारंभांमध्ये त्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. रोपविक्रीतून उत्पन्न फळबाग उत्पादनात चांगला जम बसविल्याने परिसरातून फळांच्या रोपांविषयी काळे यांच्याकडे विचारणा होते. काळे यांनी ही संधी हेरून पेरू, सीताफळ, अंजीर रोपांची विक्री सुरू केली आहे. प्रति रोप पेरू ८० ते १०० रू, सीताफळ ३० रुपये, अंजीर ४० रुपये या प्रमाणे विक्री होते. वर्षभरात १० ते १५ हजार रोपांचा खप होतो. संपर्क- देवराम काळे- ९६८९५२९५७५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.