डॉ. रामचंद्र साबळेमहाराष्ट्रावर रविवारी (ता. २१) हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका कमी राहील. त्याचाच अर्थ किमान व कमाल तापमानात वाढ होऊन थंडीची तीव्रता कमी राहील. मात्र सोमवारी (ता. २२) महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४ हेप्टापास्कलपर्यंत वाढ होईल. याचाच अर्थ किमान व कमाल तापमानात मध्यम स्वरूपात घसरण होईल. थंडीचे प्रमाण वाढेल. मंगळवार ते शनिवार (ता. २३ ते २७) या ५ दिवसांत हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका कमी राहून कमाल व किमान तापमानात वाढ होईल. .थंडी मध्यम स्वरूपात राहील. रविवारी (ता. २१) महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याच्या दिशेत बदल होत असल्याने थंडीत चढ-उतार जाणवेल. किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत राहिल्यास ऊस पिकात साखरेचे प्रमाण वाढून साखर कारखान्यांच्या रिकव्हरीत वाढ होईल. तसेच हरभरा, गहू अशा रब्बी पिकांची वाढ चांगली होऊन या वर्षी उत्पादन चांगले मिळू शकेल. सध्याचे हवामान सर्व रब्बी हंगामातील पिकांना पोषक राहील. आंबा पिकास मोहर लवकर येईल. हवामान स्थिर राहील. मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत..अरबी समुद्र व हिंदी महासागराच्या पाणी पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, तर बंगालचे उपसागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. हे सरासरीच्या जवळपास असल्याने समुद्री भागात हवामान स्थिर राहील. मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १९ अंशांपर्यंत, तर इक्वेडोरजवळ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्याने ‘ला निना’ चा प्रभाव नाही. त्यामुळे कोणतेही मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. हवामान स्थिर व रब्बी पिकाच्या वाढीसाठी अनुकूल राहील..Hawaman Andaj: राज्यात थंडी कायम; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानातील घट कायम.कोकणकमाल तापमान ठाणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांत ते ३३ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात तेे ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत १८ अंश, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत २० अंश आणि रायगड जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात सोमवार (ता. २२) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील. किमान सापेक्ष आर्द्रता पालघर जिल्ह्यात ४६ टक्के, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ५१ ते ५२ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७ टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्यात ६१ टक्के राहील. किमान सापेक्षा आर्द्रता पालघर जिल्ह्यात २२ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ३४ टक्के, ठाणे जिल्ह्यात ३५ टक्के, आणि रायगड जिल्ह्यात ३९ टक्के राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ किमी, रत्नागिरी जिल्ह्यात ८ किमी, आणि सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत तो ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत उत्तरेकडून राहील..उत्तर महाराष्ट्रकमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २७ अंश, धुळे जिल्ह्यात २८ अंश, आणि नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ते २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १४ अंश, धुळे जिल्ह्यात १५ अंश आणि नंदुरबार जिल्ह्यात ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५८ ते ६० टक्के राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता धुळे व नाशिक जिल्ह्यात २९ ते ३० टक्के, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग धुळे व जळगाव जिल्ह्यात १० ते ११ किमी आणि नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात ताशी १४ किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत पूर्वेकडून राहील..मराठवाडालातूर, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर धाराशिव, नांदेड व परभणी जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर, नांदेड, परभणी व जालना जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस; बीड, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ अंश; धाराशीव जिल्ह्यात ते १६ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत विशेषतः रविवार आणि सोमवार (ता. २१, २२) ला आकाश अंशतः ढगाळ राहील. किमान सापेक्ष आर्द्रता धाराशीव जिल्ह्यात ५१ टक्के; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५४ टक्के; लातूर व हिंगोली जिल्ह्यात ५५ ते ५६ टक्के; बीड जिल्ह्यात ५८ टक्के राहील. मात्र नांदेड व परभणी जिल्ह्यात किमान सापेक्ष आर्द्रता ६० ते ६३ टक्के राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता धाराशिव जिल्ह्यात १९ टक्के, लातूर जिल्ह्यात २२ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २० टक्के, हिंगोली जिल्ह्यात २५ टक्के, बीड जिल्ह्यात २६ टक्के, परभणी व जालना जिल्ह्यांत २८ ते २९ टक्के आणि नांदेड जिल्ह्यात ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नांदेड व परभणी जिल्ह्यात ८ किमी; बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १० किमी; लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १३ किमी आणि धाराशीव जिल्ह्यात ताशी १४ किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात ईशान्येकडून राहील..Maharashtra Cold Wave: नंदूरबार ते सोलापूर थंडीची लाट.पश्चिम विदर्भकमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २७ अंश, अकोला व अमरावती जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यात १४ अंश, वाशिम जिल्ह्यात १५ अंश आणि बुलडाणा जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. हवामान अंशतः ढगाळ राहील. किमान सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ४९ टक्के राहील, तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात ५१ ते ५६ टक्के आणि अकोला जिल्ह्यात ६१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २३ ते २८ टक्के राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात पूर्वेकडून राहील..मध्य विदर्भकमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत २७ अंश, वर्धा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १३ अंश, यवतमाळ जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ४५ टक्के; वर्धा, व यवतमाळ जिल्ह्यात ५६ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात १६ टक्के, वर्धा जिल्ह्यात ५९ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात २८ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व उत्तरेकडून राहील. दुपारी हवामान कोरडे राहील..पूर्व विदर्भकमाल तापमान चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश, तर गडचिरोली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १२ अंश, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत १३ अंश, आणि चंद्रपूर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत ५५ टक्के, तर गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत ५९ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २४ टक्के, भंडारा जिल्ह्यात २५ टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यात २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ५ ते ६ किमी, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ८ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा उत्तरेकडून राहील..दक्षिण पश्चिम महाराष्ट्रकमाल तापमान अहिल्यानगर जिल्ह्यात २७ अंश आणि कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यांत २९ अंश, तर सातारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात १० अंश, सातारा जिल्ह्यात १२ अंश, अहिल्यानगर जिल्ह्यात १३ अंश, सांगली जिल्ह्यात १४ अंश, कोल्हापूर जिल्ह्यात १५ अंश, आणि }सोलापूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ५३ ते ५९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्यात ६१ टक्के आणि पुणे जिल्ह्यात ७५ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता सोलापूर जिल्ह्यात २५ टक्के,अहिल्यानगर जिल्ह्यात ३० टक्के, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३२ टक्के, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३६ टक्के व सोलापूर जिल्ह्यात २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ४ ते ७ कि.मी आणि अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यात ताशी १३ ते १४ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील..कृषी सल्लाआंबा मोहराची काळजी घ्यावी. मोहरावर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसताच शिफारशीत कीडनाशकाची त्वरित फवारणी घ्यावी.रब्बी ज्वारीचे पीक ५५ दिवसांनी पोटरीत येताच संरक्षित पाणी करावे.जानेवारी महिन्यात सुरू ऊस लागवडीसाठी को ८६०३२, फुले १००१, फुले, फुले ११०८२ किंवा फुले १५०१२ या पैकी योग्य वाणाची निवड करावी.तूर पिकास शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये संरक्षित पाणी द्यावे.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.