Agri Weather Forecast: महाराष्ट्रावर आजपासून शनिवारपर्यंत (ता.२६ एप्रिल ते १ मे) या ७ दिवसांच्या कालावधीत हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके राहतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. जेव्हा हवेचे दाब कमी होतात तेव्हा कमाल व किमान तापमानात वाढ झालेली असते. आठवड्याच्या सुरुवातीस कमाल तापमान मराठवाड्यात ४० ते ४२ अंश सेल्सिअस, पश्चिम विदर्भात ४३ ते ४५ अंश सेल्सिअस, मध्य विदर्भात ४४ ते ४५ अंश सेल्सिअस, पूर्व विदर्भात ४५ अंश सेल्सिअस राहील. साहजिकच हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. यावर्षी मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता दिसत आहे. .सध्या अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर बंगालचे उपसागराच्या दक्षिण भागात ३१ अंश सेल्सिअस आणि उत्तर भागात २८ अंश सेल्सिअस इतके आहे. हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागात ते ३१ अंश सेल्सिअस इतके आहे. बऱ्याचशा समुद्री भागातील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक आहे..यामुळे बाष्पीभवनाचा वेग अधिक आहे. त्यामुळे पूर्वमोसमी पाऊस होत आहे. दुसऱ्या बाजूस प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १७ अंश सेल्सिअस आणि इक्वॅडोरजवळ २५ अंश सेल्सिअस इतके असून ते सरासरी तापमानापेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागावर हवेचे दाब अधिक आहेत. त्यामुळे हिंदी महासागरावरील बाष्पयुक्त वारे तिकडे न जाता भारताचे दिशेने बंगालचे उपसागराचे बाजूने प्रवेश करीत आहेत. याचा परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यात ढगाळ हवामान व पूर्व मोसमी पाऊस होत आहेत..थोडक्यात प्रशांत महासागरावर ‘ला-निना’चा प्रभाव अद्याप असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वमोसमी पाऊस होत आहेत. सन १९७२ चे दुष्काळी वर्षाचा बारकाईने अभ्यास केला असता त्या वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पुणे येथे फक्त ५० मिमी पाऊस झाला असल्याचे दिसून आले. या वर्षी एप्रिलच्या सुरुवातीस पुण्यात वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी ६५ मि.मी. पेक्षा अधिक म्हणजे ८० ते १०० मि.मी. पाऊस झाला. यावरून यावर्षी मॉन्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात चांगल्या पावसाची अपेक्षा असल्याचे दिसून येते..Maharashtra Heatwave: हवामान विभागाचा विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’.कोकणकमाल तापमान रायगड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस तर ठाणे जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस आणि पालघर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस तर पालघर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आग्नेयेकडून तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ताशी ३ कि.मी. तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी ४ कि.मी आणि पालघर जिल्ह्यात ताशी ७ कि.मी. राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पालघर जिल्ह्यात ६० टक्के तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत ८१ टक्के व रत्नागिरी जिल्ह्यात ८७ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पालघर, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४१ ते ४८ टक्के तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ७० टक्के राहील..उत्तर महाराष्ट्रधुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, नाशिक जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस तर जळगाव जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ते २७ अंश सेल्सिअस आणि नाशिक जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ताशी ८ ते ९ कि.मी. तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ताशी १० ते ११ कि.मी. राहील. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ टक्के तर जळगाव जिल्ह्यात ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ टक्के राहील..मराठवाडाकमाल तापमान लातूर व जालना जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस तर धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. बीड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस तर नांदेड जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर व जालना जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १४ कि.मी. तर बीड व हिंगोली जिल्ह्यांत ताशी ८ ते ९ कि.मी, धाराशिव, लातूर व परभणी जिल्ह्यांत ताशी ६ कि.मी राहील..पश्चिम विदर्भकमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ४३ टक्के तर अकोला व अमरावती जिल्ह्यात ४४ टक्के आणि बुलडाणा जिल्ह्यात ४५ टक्के राहील. किमान तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५५ टक्के तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ७० ते ८२ टक्के राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३९ टक्के तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ५१ ते ६० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी राहील..Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाच्या चटक्यांत वाढ.मध्य विदर्भकमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस आणि वर्धा जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ५६ टक्के तर वर्धा जिल्ह्यात ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग यवतमाळ जिल्ह्यात ताशी १० कि.मी. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ताशी २ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील..पूर्व विदर्भचंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस तर भंडारा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ५६ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात ६२ टक्के आणि भंडारा जिल्ह्यात ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत ३२ ते ३९ टक्के तर भंडारा जिल्ह्यात ५१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ताशी ६ ते ७ कि.मी. तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ताशी १० ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील..पश्चिम महाराष्ट्रसोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता राहील. तर सांगली जिल्ह्यात ३ मि.मी., कोल्हापूर जिल्ह्यात ४ मि.मी., पुणे जिल्ह्यात २ मि.मी. आणि सातारा जिल्ह्यात १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून तर सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत वायव्येकडून मात्र सांगली जिल्ह्यात पूर्वेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर व सांगली जिल्ह्यांत ताशी ७ कि.मी. तर कोल्हापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ताशी १० ते ११ कि.मी. राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस तर सांगली व पुणे जिल्ह्यांत ४० ते ४१ अंश सेल्सिअस, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २९ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ६० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते १२ टक्के राहील..कृषी सल्लाकांदा काढणीनंतर शेतात वाळविताना ढीग न करता पहिला कांदा दुसऱ्या कांद्याच्या पातीने झाकून जाईल असा एकसारखा पसरून वाळवावा.नुकत्याच लागवड केलेल्या फळपिकांच्या रोपांना सावली करावी.खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून जमिनीची पूर्व मशागतीची कामे सुरू करावीत.फळबागांमध्ये ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉरसाउथ आशिया)