Pune News: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात आजपासून (ता. २६) पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे..उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंत २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा अद्यापही ३० अंशांच्या वरच स्थिरावला असल्याचे दिसून येते. पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरी कोसळल्याने गडचिरोली येथे उच्चांकी ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली..राज्यात आजपासून (ता. २६) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याने, तसेच उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे..Maharashtra Weather: पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार .कमी दाब क्षेत्र होणार तीव्रदक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्यापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यातच पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. आज (ता. २६) ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येताना तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. २७) ही प्रणाली जमिनीवर येण्याची शक्यता आहे..मॉन्सून परतीची वाटचाल जैसै थेनैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २४) संपूर्ण, पंजाब, हरियाना, चंदीगड आणि दिल्लीमधून मॉन्सूनने काढता पाय घेतला. तसेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. रामपूर, हरिद्वार, मुरादाबाद, बांस्वरा, विद्यानगर, वेरावल पर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा गुरुवारी कायम होती. पुढील दोन दिवसांत उत्तर भारताच्या आणखी काही भागातून मॉन्सूनची माघार होण्याची शक्यता आहे..गुरुवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२९.६---१९.६अहिल्यानगर---२७.८---१९.५धुळे---३२.०---१८.६जळगाव---३२.०---२२.२जेऊर---२८.०---१७.०कोल्हापूर---२९.३---२१.३महाबळेश्वर---२०.५---१५.१मालेगाव---२९.४---१८.८.Rain Alert: पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा.नाशिक---३०.१---१९.८निफाड---२९.५---२२.८सांगली---३०.९---२०.३सातारा---३०.४---१९.४सोलापूर---३०.७---२१.४सांताक्रूझ---३१.५---२४.६डहाणू---३२.१---२३.४रत्नागिरी---३०.१---२३.७.छत्रपती संभाजीनगर---२९.८---२१.०धाराशिव---२८.१---निरंकपरभणी---३१.६---२२.०अकोला---२९.२---२३.८अमरावती---३३.४---२३.१भंडारा---निरंक---२२.०बुलडाणा---२९.०---२१.३.ब्रह्मपुरी---३१.०---२३.६चंद्रपूर---३२.०---२३.६गडचिरोली---३२.४---२३.४गोंदिया---२९.९---२३.८नागपूर---३४.२---२५.४वर्धा---३४.१---२४.९वाशीम---३१.२---२२.०यवतमाळ---३१.४---२२.३.जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर.विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :पालघर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.