Pune News: राज्यात अजूनही सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका, अशी परिस्थिती जाणवत आहे. धुळे येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तर कोकणात कमाल तापमानाचा पारा कायम आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असल्याने राज्यातही थंडी वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. .राज्यात किमान तापमानातील घट कायम असल्याने सकाळी चांगलीच थंडी जाणवत आहे. राज्यभरात थंडीचा कडाका आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत धुळे येथे सर्वात कमी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती..Cold Weather Alert: उत्तर भारतात थंडीचा जोर वाढणार .तर जळगाव येथे ८.७ अंशाची नोंद झाली. जेऊन येथे ९ अंश सेल्सिअस आणि अहिल्यानगर येथेही ९.५ अंशाची नोंद झाली होती. मोहोळ येथेही ९.५ अंश तापमान होते. त्यामुळे या भागात थंडीचा लाट कायम आहे. .Maharashtra Cold Weather: जळगावमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा.कोकणात मात्र कमाल तापमान जास्त आहे. रत्नागिरी येते राज्यातील सर्वाधिक ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर डहाणू येथेही कमाल तापमान ३४ अंशावर होते. कोकणातील इतर भागातही तापमानाचा पारा ३० अंशापेक्षा जास्त होता. राज्याच्या बहुतांशी भागात तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. त्यामुळे राज्यात दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यात थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. .उत्तर भारतात तापमानात घसरण नोंदवली जात असून अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.