Maharashtra Government Decision: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे ३२ हजार अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार असून, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.