Video
Heavy Rain Losses: अतिवृष्टीमुळे मोसंबी, ऊस, सोयाबीनचे मोठे नुकसान ; शेतकरी हतबल I Agrowon
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून मोसंबी, ऊस आणि सोयाबीन पिके पाण्यात सडून गेली आहेत. शेतात गुडघ्याएवढं पाणी साचल्यामुळे उसाची पिकं नष्ट झाली, मोसंबीच्या झाडांना अति पाण्याचा फटका बसला आणि सोयाबीन सुद्धा खराब झालं आहे. मंत्र्यांनी पाहणी केली असली तरी शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की त्यांना सरसकट नुकसानभरपाई आणि कर्जमाफी दिली जावी, कारण दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिलेलं नाही