Crop Insurance Compensation: सरकारने ‘बनिया’ वृत्ती सोडून द्यावी, असे म्हणत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी (५ मार्च) विधानसभेत शेती प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका केली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत २९३ च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी सोयाबीन आणि कापसाचे दर, भारत–अमेरिका करार, पीएम किसान योजना तसेच पीक विमा या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर कडाडून टीकास्त्र सोडले. तर सत्ताधारी पक्षातील आमदार अब्दुल सत्तार यांनी मक्यासाठी भावफरक देण्याची मागणी केली. मग विधिमंडळात शेती प्रश्नावरून नेमके काय घडले? नाना पटोले यांनी सरकारवर कोणते आरोप केले? राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे का? याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.