Video
Crop Care in Heavy Rain: नुकतंच पेरणी केलेल्या शेतात अतिवृष्टी झाल्यास काय करावे?
राज्यात सध्या पावसानं हजेरी लावलीये.. पण कुठं संततधार, कुठं मुसळधार तर कुठं अगदी अतिवृष्टी.. एका बाजुला शेतकऱ्यांनी नुकत्याच पेरण्या केल्यात तर काही जणांच्या शेतात उगवण झालीये.. आणि फळबागाही आहेतच.. अशा परिस्थितीत शेतांमध्ये पाणी साचणं, मुळांना ऑक्सिजन न मिळणं, मातीची आणि अन्नद्रव्यांची धूप होणं यासोबत रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भितीसुद्धा आहेच.. अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हानच असते.. पण वेळीच योग्य गोष्टींची काळजी घेतली, उपाययोजना केल्या तर पिकं आणि फळबागा वाचवण्यात यश मिळू शकतं..
