Video
Cabinet Meeting : राज्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी (ता.१५) रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. कारण या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार आजच्या बैठकीत दुष्काळावर अर्धा ते पाऊणतास दुष्काळा चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हानिहाय सादरीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली आहे. मग मुख्यमंत्री काय म्हणाले? बैठकीत काय झालं? दुष्काळाच्या उपाययोजनाची मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली? जाणून घेऊया आजच्या द अग्रोवन शोमधून.....
