जिरायती गव्हाच्या लागवडीमध्ये ओलाव्याचे महत्त्व मोठे आहे. या ओलाव्याचा वापर योग्य प्रकारे केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. बियाणे ५ से.मी.पेक्षा जास्त खोल पेरू नये, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा/वापसा असताना पेरणी करावी.
जमिनीत ओलावा टिकवण्याचे तंत्रज्ञान रब्बी हंगामात पावसाचे पाणी गहू पिकाच्या जमिनीत कसे मुरवता येईल यासाठी खालील तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
बांधबंदिस्ती करणे परतीच्या पावसाची तीव्रता जास्त असल्यास व जमीन उताराची असल्यास, पावसाचे पाणी जास्त वेगाने वाहून जाते. परिणामी ते जमिनीत कमी मुरते. अशा उथळ व मध्यम खोल जमिनीत समपातळीतील बांध व खोल जमिनीत ढाळेचे बांध टाकावेत. पाणी अडवले जाऊन दीर्घकाळ मुरवले जाईल. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
आंतरबांध व्यवस्थापन जिरायत गहू पिकाखालील विशेषतः खोल जमिनीत लहान सरी वरंबे पाडून किंवा लहान सारे पडावेत व जमिनीत बांधणी करावी.
उतारास आडवी मशागत करावी
कोळपणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे
: डॉ. विजेंद्र बाविस्कर, ८३७४१७४७९७ (कृषी विद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.