डॉ. समाधान सुरवसे Soil Health: उन्हाळ्यात जमिनीची मशागत करताना एप्रिल-मे महिन्यांत कडक उन्हात साधारण २० ते ३० सेंमी खोल नांगरणी करणे आवश्यक आहे. यासाठी मोल्डबोर्ड नांगराचा वापर केल्यास जमिनीतील कडक थर तुटून माती भुसभुशीत बनते आणि पुढील पिकाच्या मुळांना योग्य वाढीस मदत होते. नांगरणीनंतर जमीन १० ते १५ दिवस उन्हात तापू द्यावी. त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे तणांची बियाणे, कीड व रोगकारक अवस्था नष्ट होतात. मशागत नेहमी कोरड्या जमिनीत करावी. .ओलसर मातीमध्ये नांगरणी केल्यास माती घट्ट होऊन तिची रचना बिघडते. नांगरणी केल्यानंतर २ ते ३ वेळा कुळवणी किंवा रोटावेटर मारून मोठे ढेकळे फोडून माती अधिक भुसभुशीत करावी. मागील पिकाचे अवशेष जमिनीत नीट मिसळावेत. त्याच वेळी शेणखत किंवा कंपोस्ट हेक्टरी सुमारे ८ ते १० टन प्रमाणे वापर करून मातीची सुपीकता वाढवावी. शेवटी जमीन समतल करून आवश्यक असल्यास सरी-वरंबा तयार करावा, त्यामुळे पावसाचे पाणी योग्यप्रकारे साठवले जाते. उताराच्या जमिनीत आडवी मशागत केल्यास मृदा धूप कमी होते. माती व पिकानुसार योग्य मशागत केल्यास पाणी साठवण, पोषकद्रव्यांची उपलब्धता आणि उत्पादनात लक्षणीय सुधारणा होते..Soil Tillage Methods: जमिनीची मशागत करताना लक्षात ठेवायच्या ३ महत्त्वाच्या गोष्टी!.जमिनीच्या प्रकारानुसार मशागतजमिनीच्या प्रकारानुसार मशागतीय पद्धती बदलत जाते. मातीचा प्रकार आणि पिकाचा प्रकार लक्षात घेऊन मशागत केल्यास पिकांची वाढ, उत्पादन आणि पाणी-खत व्यवस्थापन अधिक परिणामकारक होते. हलक्या जमिनीत जास्त खोल नांगरणी टाळावी, कारण हलकी माती लवकर सैल होते आणि ओलावा कमी धरते. त्यामुळे १० ते १५ सेंमी उथळी मशागत व कमी वेळा कुळवणी करावी. .मध्यम जमिनीत १५ ते २० सेंमी खोल नांगरणी करून २ ते ३ वेळा कुळवणी केल्यास भुसभुशीत व समतोल रचना मिळते, जी बहुतेक पिकांसाठी योग्य असते. भारी जमिनीत मात्र उन्हाळ्यात २० ते ३० सेंमी खोल नांगरणी करणे फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे जमिनीचा कडक थर तुऊन पाण्याची झिरपण क्षमता वाढते. अशा जमिनीत ओलसर अवस्थेत मशागत टाळावी, अन्यथा ढेकळे तयार होतात. उताराच्या जमिनीत आडवी मशागत करणे गरजेचे आहे, जेणेकरून मृदा धूप कमी होईल..Zero Tillage Farming: पिकांचे मूळ जमिनीला देऊन सेंद्रिय कर्ब वाढविणे शक्य : चिपळूणकर.पीक प्रकारानुसार मशागतपिकांच्या प्रकारानुसारही मशागत बदलते. ऊस, कापूस, मका यांसारख्या खोल मुळे जाणाऱ्या पिकांसाठी जमिनीची खोल नांगरणी आणि सरी-वरंबा पद्धत उपयुक्त असते, त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते. गहू, हरभरा, सोयाबीन यांसारख्या मध्यम मुळांच्या पिकांसाठी मध्यम खोलीची मशागत व भुसभुशीत जमीन आवश्यक असते..भाजीपाला व बागायती पिकांसाठी बारीक भुसभुशीत व समतल जमीन तयार करणे महत्त्वाचे असते. तसेच पाण्याची उपलब्धता व हंगामानुसार सरी-वरंबा, बेड पद्धत किंवा सपाट पेरणी पद्धत निवडावी..उन्हाळ्यात मशागत करण्याचे फायदेकडक उन्हामुळे तणांचे बियाणे, किडींच्या अंडी व अळी अवस्था नष्ट होतात.बुरशीजन्य व मातीतील रोगकारकांचे प्रमाण कमी होते.जमिनीतील कडक थर तुटून माती भुसभुशीत बनते.पिकांच्या मुळांची वाढ खोल व मजबूत होते.हवा व पाण्याची हालचाल सुधारते.पावसाचे पाणी जमिनीत जास्त प्रमाणात मुरते.तणांचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव कमी होतो.पिकांचे अवशेष जमिनीत मिसळल्यामुळे सेंद्रिय पदार्थ वाढतात..सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता सुधारते.मातीची सुपीकता व पोषक तत्त्वांची उपलब्धता वाढते.जमिनीची रचना सुधारून समतलता राखली जाते.पिकांची उगवण व वाढ जोमदार होते.कीडनाशके व तणनाशकांवरील खर्च कमी होतो.पीक उत्पादन व उत्पन्नात अपेक्षित वाढ मिळण्यास मदत होते.- डॉ. समाधान सुरवसे ९८६०८ ७७०४९(शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, बु. जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.