सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी आपले त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न चालू असल्याचे दिसत नाही, ही बाब अधिक खटकणारी आहे.सुमारे चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न निर्धारित केले आहे. तेव्हापासून विविध व्यासपीठांवरून प्रामुख्याने अर्थतज्ज्ञ याबाबत आपले विचार मांडत आहेत. काही अर्थतज्ज्ञांना हे दिवास्वप्न वाटते, तर काही हे स्वप्न साकार करण्यासाठीची दिशा दाखवितात. कोल्हापूरमध्ये नुकतीच एक राष्ट्रीय परिषद पार पडली. .या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष - प्रख्यात अर्थतज्ञ्ज डॉ. एस. महेंद्र देव यांनी विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी समावेशक आणि पर्यावरणपूरक विकासावर भर देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. विकसित राष्ट्रासाठीचे आर्थिक, सामाजिक मापदंड ठरलेले आहेत..Viksit Bharat 2047: विकसित भारताचे स्वप्न २०४७ पर्यंत साकार.त्यात प्रामुख्याने दरडोई उत्पन्न, औद्योगिकीकरणाचा स्तर, सर्वसाधारण राहणीमानाचा दर्जा, तांत्रिक संरचना, मानवी विकास निर्देशांक, साक्षरता, आरोग्य आदींचा वस्तुनिष्ठ विचार केला जातो. जागतिक बँकेच्या वर्गीकरणानुसार दरडोई राष्ट्रीय उत्पन्न १३,५०० डॉलर्सपेक्षा जास्त असलेल्या देशांना उच्च उत्पन्न राष्ट्र म्हणतात. भारत सध्या कनिष्ठ मध्यमवर्गात - म्हणजे दरडोई उत्पन्न ४४०० डॉलर्सपेक्षा कमी असलेल्या राष्ट्रांत मोडतो. आपले दरडोई उत्पन्न केवळ २४०० डॉलर्सच्या आसपास आहे..पुढील २०-२२ वर्षांमध्ये उच्च उत्पन्न गटात मोडण्यासाठी असलेली मर्यादा २२,००० डॉलर्स इतकी वाढलेली असेल. अशा वेळी आपल्याला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत बसायचे असेल, तर अर्थव्यवस्था वाढीचा दर हा सातत्याने नऊ ते दहा टक्के असायला हवा, जो मागील कित्येक वर्षांपासून सहाच्या आसपासच राहिला आहे. याशिवाय आपल्या येथील एकूणच पायाभूत सुविधा, औद्योगिकीकरणाचा स्तर, मानवी विकास निर्देशांक, साक्षरता, आरोग्य, राहणीमान याबाबतही विकसित राष्ट्रांच्या आसपास देखील आपण दिसत नाही..Viksit Bharat Employment Scheme: ‘विकसित भारत रोजगार’ची प्रभावी अंमलबजावणी.विकसित भारताच्या वाटेत हवामान बदल तसेच जागतिक अस्थिरता ही आव्हाने आहेत. परिस्थिती कशीही असली, तरी उद्दिष्ट मोठे ठेवणे हा काही गुन्हा नाही. उद्दिष्ट मोठे ठेवून त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत, अपयश पदरी पडले तरी हरकत नाही, असे म्हटले जाते. परंतु आपले त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न सुद्धा चालू असल्याचे दिसत नाही, ही बाब अधिक खटकणारी आहे. विकसित भारताचे आधारस्तंभ शेतकरी, युवा, महिला, गरीब असल्याचे सांगितले जाते. परंतु देशात सर्वाधिक संकटात हे आधारस्तंभच आहेत..शेती तोट्याची ठरत असल्याने त्यातून बाहेर पडून इतर कुठलाही उद्योग-व्यवसाय-नोकरी करून पोट भरण्याच्या मानसिकतेत देशभरातील शेतकरी आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही. बेरोजगारीने तरुण त्रस्त आहेत. शेतीपासून ते उद्योग व्यवसायात महिलांची पुढे यायची धडपड आहे, परंतु त्यांना समान संधी मिळत नाही. हक्क, अधिकार, स्वातंत्र्यासाठी महिलांना प्रत्येक ठिकाणी झगडावे लागते..सर्वसमावेशक आणि पर्यावरणपूरक विकासाबाबतही देशात आनंदी आनंदच आहे. देशात प्रचंड आर्थिक विषमता आहे. गंभीर बाब म्हणजे यास पूरक ध्येयधोरणांचा अवलंब सध्या सुरू आहे. विकासाच्या नावाखाली पश्चिम घाट, अरवली पर्वत ते हिमालयाचे लचके तोडले जात असताना पर्यावरणपूरक विकासाचा सर्वांना विसर पडतो..विकसित भारताच्या दिशेने खरेच आपल्याला वाटचाल करायची असेल, तर शेती-उद्योगासाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. शेतीसह एकंदरीतच निर्मिती क्षेत्राचा विस्तार करावा लागेल. आपली उत्पादने जगभरातील बाजारपेठेत पाठवावी लागतील. हे करीत असताना शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आदी सेवा सुधारून एकंदरीतच लोकांचे जीवनमान कसे उंचावेल, हेही पाहावे लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.