India Five State Election Result: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालात आसाम आणि पुद्दुचेरी वगळता तीन महत्त्वाच्या राज्यांत यावेळी लोकांनी सत्ताधाऱ्यांना खाली खेचले आहे. त्यातही साऱ्यांचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालाकडे लागून राहिले होते, याचे कारण या राज्यांतील निवडणूक देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम घडवणार, हे उघड होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूचे एम. के. स्टॅलिन यांचे केंद्रातील राजवटीच्या विरोधातील आक्रमक प्रादेशिकवादाचे राजकारण या समजाला खतपाणी घालणारेच होते. .पण विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी त्या सगळ्या समीकरणांना तूर्त सुरुंग लावला आहे. या दोघांनाही मतदारांनी दणका दिला आहे. भारतीय जनता पक्षानेही पश्चिम बंगालचा गड जिंकायचाच, असा निश्चय करीत आपल्या ताब्यातील सर्व यंत्रणांना ‘कामाला’ लावून, पक्षाची संघटनात्मक ताकद पणाला लावत ही निवडणूक लढवली आणि जिंकलीदेखील!.Tamil Nadu Election Results 2026: तामिळनाडूत मोठा उलटफेर, सुपरस्टार थलपती विजय यांचा 'टीव्हीके' बहुमताच्या जवळ, द्रविड पक्षांच्या वर्चस्वाला धक्का.नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे कोणतीही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतात, त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. गेल्या निवडणुकीतच त्यांना प. बंगाल जिंकायचा होता. पण ७७ जागांवरच ममतादीदींनी त्यांना रोखले. मात्र त्यानंतर लगेचच पक्षाने जय्यत तयारी सुरू केली. या ‘जय्यत तयारी’त संघटनात्मक विस्ताराचे प्रयत्न जसे होते, तसेच ‘प्रशासकीय’ पातळीवरील प्रयत्नही होते. शिवाय नेहमीचा ध्रुवीकरणाचा प्रयोगही होताच..‘साध्य-साधन विवेक’वगैरे शब्ददेखील आता अडगळीत गेले आहेत. राजकारणात कोणी ते उच्चारतही नाहीत, मग आचरण्याची गोष्ट दूरच. त्याचे एक उदाहरण म्हणजे मतदारयाद्यांच्या ‘शुद्धीकरणा’साठी निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या ऐन तोंडावर आखलेली मोहीम! ती कमालीची वादग्रस्त ठरली, ती त्याच्या टायमिंगमुळे. त्या छाननीत ९० लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यातील २७ लाख लोकांनी अपील केले होते; परंतु त्यांना मतदानाची संधी मिळाली नाही..केंद्रीय संस्थांच्या स्वायत्ततेविषयी न बोललेलेच बरे! हे सगळे आक्षेप आणि टीका खरी असली तरी प. बंगालमधील यावेळच्या जनादेशाची मीमांसा एवढ्याच मुद्द्यापुरती करणे राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांना राजकीयदृष्ट्या सोईचे वाटत असले तरी ती आत्मवंचनाच ठरेल. राज्याच्या राजकीय संस्कृतीत मुरलेल्या हिंसाचारापासून तेथील राजकारण मुक्त करण्यात ममतादीदींना अपयश आले, एवढेच नव्हे तर त्यांची राजवटदेखील दमनकारी होती. प्रचाराचा रोख मोदी राजवटीला विरोध करण्यावर केंद्रित झाला होता. परंतु सर्वसामान्य जनतेच्या आकांक्षांना प्रतिसाद देईल, अशा मुद्यांचा अभाव होता. प. बंगालच्या राजकारणातील हे महत्त्वाचे वळण आहे..West Bengal Election Results 2026: ममतांच्या हातून पश्चिम बंगाल निसटलं, भाजपची जोरदार मुसंडी.आसामातील हेमंतबिस्वा सर्मा यांच्या नेतृत्वाखालील हॅटट्रिकही भाजपला बळ देणारी ठरेल. केरळमधील विजयामुळे कर्नाटक आणि तेलंगणापाठोपाठ काँग्रेसच्या खात्यात आता दक्षिणेतील तिसऱ्या राज्याची भर पडली आहे. एकीकडे भाजपची ओळख उत्तर भारतीय पक्ष म्हणून दृढ झाली असताना काँग्रेसने दक्षिणेत विस्तार करून आपले अस्तित्व शाबूत राखले आहे. लोकप्रिय अभिनेत्याविषयी सर्वसामान्य जनतेला वाटणारे आकर्षण कोणता चमत्कार घडवू शकतो हे अभिनेते थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळनाडूमध्ये आलेल्या टीव्हीकेच्या त्सुनामीने दाखवून दिले आहे..राजकीय पदार्पणातच सत्तेला गवसणी घालणारे विजय यांच्या यशाने तमिळनाडूच्या जनतेचे रुपेरी पडद्याविषयी असलेले आकर्षण नव्याने अधोरेखित केले आहे. जनतेने एकाच फटक्यात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि केरळमध्ये डावी आघाडी यांची सद्दी संपवून त्यांचे अस्तित्व संकटात आणले आहे. या तडाख्यातून काँग्रेस पक्ष बचावला आहे. भाजपला देशव्यापी टक्कर देण्यासाठी तूर्तास नसलेले सामर्थ्य निर्माण करण्याची संधी त्यामुळे काँग्रेसला मिळाली आहे. पण तिचा फायदा कसा करून घेतला जाईल हे पाहायला लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.