Feed Management in Dairy Farming: पूर्वी शेतकऱ्यांना ‘चारा लागवड करा’ असा सल्ला देण्याची कधी गरजच नव्हती. घरची ८-१० जनावरे सहज वर्षभर सांभाळली जातील, एवढा चारा पारंपरिक पिकांतून मिळायचा. गोठ्या शेजारच्या गंजी नेहमी उभ्या असायच्या. आता हे चित्र बदलले आहे. व्यावसायिक दूध उत्पादन सुरू झाल्याने चारा कमी पडू लागला आहे. दुष्काळ नसताना सर्वसाधारण परिस्थितीत राज्यात दरवर्षी पशुधनासाठी ४५ टक्के हिरवा, तर २५ टक्के कोरडा चारा कमी पडतो. यावरून दुष्काळात चाराटंचाई किती भीषण असते, याचा प्रत्यय आपल्याला यायला हवा. त्यामुळे चाराटंचाईबाबत निसर्गापेक्षा जास्त दोष नियोजनाला देणे क्रमप्राप्त ठरते. .ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागासह जगभरातील प्रमुख हवामान संस्थांच्या निरीक्षणानुसार मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीतच ‘एल-निनो’ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनमध्ये कमी पाऊसमानाबरोबर दुष्काळाचा सामना करावा लागेल, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. पाणीटंचाई अथवा दुष्काळाच्या काळात सर्वाधिक दुर्लक्ष चारा नियोजनाकडे होते..Fodder Shortage: नांदेडमध्ये चारा टंचाईचे सावट.आणि त्याचे अत्यंत वाईट परिणाम पशुपालकांना भोगावे लागतात. यापूर्वी चारा-पाणी टंचाईत अनेक पशुपालकांनी गोठ्यातील दावणी मोकळ्या केल्या, हे विसरून चालणार नाही. या वर्षी मात्र कमी पाऊसमानामुळे चाराटंचाई जाणवू नये, याकरिता जिल्हा नियोजन मंडळातून वैरण विकास कार्यक्रमासाठी ८ ते १० कोटी उपलब्ध करून देण्याची अगदी वेळेत मागणी पशुसंवर्धन विभागाचे सचिव रामास्वामी एन. यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली असल्याने याचे स्वागत करायला हवे..दुष्काळात मनुष्य असो वा पशुधन त्यांना पिण्यासाठीचे पाणी ऐनवेळी कुठूनही उपलब्ध करून ते पुरविता येते; परंतु तसे चाऱ्याचे करता येणार नाही. चारा मग तो हिरवा असो की कोरडा ऐनवेळी उपलब्ध करता येत नाही तर तो पूर्वनियोजनातून उपलब्ध करावा लागतो. किमान तीन-चार महिने आधीपासून नियोजन केले तर तो वेळेवर उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे सचिव यांनी केलेल्या मागणीचा जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा..Livestock Feed: सकस चाऱ्यासाठी ओट .वैरण विकास कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून देण्याबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने जिल्हानिहाय आराखडा तयार करून आपल्या जिल्ह्यात हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. चारा नियोजनात केवळ वैरण विकास कार्यक्रमावरच थांबून चालणार नाही, तर कृषी व पशुसंवर्धन विभागाने वर्षभर हिरवा, कोरडा चारा उपलब्धतेचे नियोजन करायला हवे. त्याच वेळी शेतकरी - पशुपालक यांनी दुग्ध व्यवसायाबरोबर इतर पशुधन टिकविण्यासाठी चारा नियोजन आपल्या हाती घ्यायला हवे..हिरवा चारा विशिष्ट पद्धतीने मुरवून त्यापासून मुरघास करता येतो. असा मुरघास हिरवा चारा उपलब्ध नसताना जनावरांना देता येतो. अत्यंत कमी पाणी, कमी वेळेत, कमी जागेत हायड्रोपोनिक तंत्राद्वारे हिरव्या चाऱ्याची निर्मिती करून चाराटंचाईवर मात करता येते. चाराटंचाईच्या काळात गव्हाचे काड किंवा भाताचे तूस अशा निकृष्ट चाऱ्यावर युरिया, मीठ व गूळ यांची प्रक्रिया करून तो अधिक रुचकर व पौष्टिक करता येतो..गाव परिसरातील सुबाभूळ, चिंच, ग्लिरिसिडीया, जांभूळ, तुती, शेवरी हा झाडपाला कडबाकुट्टीने बारीक करून त्यांचे मूल्यवर्धन केल्यास जनावरांना खाण्यास देता येतो. संभाव्य चाराटंचाई पाहता चारा मूल्यवर्धनाच्या या सर्व पद्धतीबाबत पशुपालकांमध्ये जागरुकता वाढवावी लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.