Pune News: तुरीचे भाव सध्या आयातीमुळे हमीभावापेक्षा किमान १२०० ते १५०० रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे कर्नाटक आणि गुजरात सरकारने पुढाकार घेऊन हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही तोच कित्ता गिरवत वेळेत खरेदी सुरू केली तरच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सोयाबीनप्रमाणे खरेदीस उशीर केल्यास शेतकरी आणखी अडचणीत येतील, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. .देशात यंदा तुरीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ७ टक्क्यांनी कमी झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणासह सर्वच तूर उत्पादक राज्यांमध्ये यंदा लागवड घटली आहे. त्यातच यंदा तुरीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांतील पावसाचा फटका बसला..MSP Tur Procurement : हमीभावाने ४० हजार ९०१ क्विंटल तूर खरेदी.तसेच सध्या सुरू असलेल्या थंडीचा आणि बदलत्या वातावरणाचाही परिणाम होत आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा घट होईल, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारनेही यंदा तुरीचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा काहीसे कमी राहून जवळपास ३६ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला आहे..तर उद्योग आणि बाजारातील अभ्यासकांच्या मते यंदा उत्पादन ३० ते ३२ लाख टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. देशातील उत्पादन सलग चौथ्या वर्षी कमी राहणार आहे. तरीही आयातीमुळे बाजारभाव दबावात आहेत. केंद्र सरकारने यंदा तुरीला प्रति क्विंटल ८ हजार रुपये हमीभाव जाहीर केला. तर सध्या देशभरातील बाजारात तुरीला सरासरी ५ हजार ९०० ते ६ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये नव्या तुरीची आवक सुरू झाली. भाव कमी असल्याने या राज्यांमध्ये हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे. कर्नाटकात ९ लाख ४० हजार टन तूर खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे..Tur Farming: शेतकऱ्यांनी तूर पिकाचे अर्थशास्त्र विचारात घ्यावे.हमीभावाने खरेदी गरजेचीराज्यातील बाजारांमध्ये तुरीची आवक पुढील दोन आठवड्यांत वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारातील आवक कमी असतानाही हमीभावापेक्षा कमी दर आहेत. आवकेचा दबाव वाढल्यानंतर दर सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे कर्नाटक आणि गुजरातप्रमाणे आताच तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे. नोंदणी सुरू करून जानेवारीतच खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. अन्यथा, सोयाबीनसारखा उशीर केला तर शेतकरी आणखी अडचणीत येण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी हमीभावानेच तूर विकावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे..आयातीचा दबावकेंद्र सरकारच्या धोरणामुळे २०२४-२५ मध्ये देशात विक्रमी ७३ लाख ४० हजार टन कडधान्यांची आयात झाली होती. यात सर्वाधिक ३० टक्के वाटा पिवळ्या वाटाण्याचा होता. तर हरभरा २२ टक्के, तूर १७ टक्के आणि मसूर आयातीचा १७ टक्के वाटा होता. मागील वर्षात १२ लाख २३ हजार टन तुरीची आयात झाली होती. तर चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यांमधील आयात सात लाख टनांवर पोहोचली आहे. यंदा तुरीची आयात गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता असली तरी देशात तुरीचा साठा उपलब्ध आहे. उत्पादन कमी राहिले तरी पुरेसा पुरवठा राहील, एवढी आयात होणार आहे. त्याचा दबाव दरावर राहील, असे अभ्यासकांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.