Nashik News: यंदा अतिवृष्टीमुळे मक्याचे मोठे नुकसान झाले. मका लागवड ते काढणीपर्यंतच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ आहे. एवढा खर्च करूनही एकरी उत्पादनात घट आहे. मात्र राज्यात प्रति क्विंटल सरासरी १६०० रुपयांपर्यंत दर मिळत असून, क्विंटलमागे शेतकऱ्यांचे ७०० ते ८०० रुपयांचे नुकसान होत आहे. यंदा दराचा प्रश्न गंभीर होत असून शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. अशा परिस्थितीत सरकार याकडे गांभीर्याने कधी पाहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. .खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने उरल्यासुरल्या मका पिकावर आशा आहेत. मात्र पेरणीखालील वाढलेल्या क्षेत्रामुळे बाजारात आवक वाढून दराला फटका बसत आहे. त्यात रब्बी हंगामासाठी भांडवल नसल्याने मका विक्रीशिवाय पर्याय नाही. मळणी करून मका वाळविल्यानंतर शेतकरी तो बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र वाढलेली आवक तर काही ठिकाणी गुणवत्तेचे कारण देत व्यापारी दर पाडून खरेदी करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले..Maize Price: मक्याचे दर गडगडले.राज्यभरात ऑगस्टनंतर मका दरात घसरण दिसून आली आहे. सप्टेंबरमध्ये मका २ हजारांच्या आत आला तर नोव्हेंबर महिन्यात नाशिकमध्ये प्रति क्विंटल सरासरी १५९५ दर मिळाले आहेत. त्यामुळे वाढलेला उत्पादन खर्च घटलेली उत्पादकता व मिळालेले उत्पन्न यातून हाती काय मिळणार अशी परिस्थिती आहे..बियाणे, खते, मजुरी यांसह सर्वच कामांसाठी दर वाढले. एकीकडे व्यापाऱ्यांकडे विक्रीशिवाय पर्याय नाही; दुसरीकडे शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे दुहेरी कोंडी होत आहे. या प्रश्नावर सरकारच्या हस्तक्षेपाची गरज असून सरकारने किमान आधारभूत किमतीच्या अनुषंगाने कारवाई करण्याची गरज आहे..Maize Rate: मक्याचे दर पडलेलेच !.आधारभूत किंमतही नाही, वेळेवर शेतकऱ्यांच्या हातात पैसेही नाहीसरकार आधारभूत किंमत का ठरवते, हाच खरा प्रश्न आहे. वास्तविक या वर्षी अतिवृष्टी झाल्याने मका तसेच इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र व्यापारी ११०० ते १७०० पर्यंत खरेदी करत आहे. त्यात पंधरा दिवस ते महिनाभर पैशासाठी थांबावे लागत आहे. हा गंभीर प्रकार असल्याचे अंदरसूल (ता.येवला) शेतकरी हरिभाऊ सोनवणे यांनी कळविले. हा प्रकार म्हणजे एक प्रकारे शासनाने शेतकऱ्यांवर केलेला अत्याचाराचा आहे, असे म्हटल्यास वावगे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे..या वर्षी चार एकरवर मका लागवड केली. त्यासाठी खर्च ६० हजार रुपये आला. मक्याचे ५५ हजार रुपये झाले. केंद्र सरकारने जाहीर केलेला मका दर या अपेक्षेवर मका लागवड केली होती; परंतु प्रत्यक्षात मका १२०० रुपये क्विंटलने विकला गेला.गणेश चव्हाण, शेतकरी, उगाव, ता. निफाड.मुळात कुठलेच पीक परवडू नये हे सरकारचे धोरण आहे. आधी मका, सोयाबीन ही पिके निविष्ठा खर्च व मजुरी कमी असल्याने घेतली जात होती, ती परवडत होती. मागील काही वर्षात केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे खरीप पिके परवडत नाहीत. चालू वर्षी ५ एकर जमीन अडकवून १.५ लाख रुपये सुद्धा मिळत नाही. हर्षाली घुले, शेतकरी कन्या, आडगाव टप्पा, ता. चांदवड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.