Kolhapur News: इराण आणि अमेरिका-इस्त्राईलमध्ये सुरू असलेले युद्ध तसेच अफगाणिस्तानमधील अस्थिरतेचा परिणाम भारतीय साखर निर्यातीवर दिसू लागला आहे. भारताकडून साखर आयात करणारे अनेक देश या भागातील असल्याने सध्या साखरेच्या निर्यात व्यवहारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. काही देशांकडून भारतीय साखरेबाबत चौकशी होत असली तरी प्रत्यक्ष खरेदीचे करार मात्र ठप्प असल्याची माहिती व्यापार क्षेत्रातून मिळत आहे. .केंद्राने पहिल्यांदा दहा लाख व नंतर पाच लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. जागतिक बाजारात स्थानिक बाजारपेठेपेक्षा साखरेचे दर कमी असल्याने नाममात्र निर्यात होत होती. भारतीय साखरेसाठी पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील काही देश महत्त्वाच्या बाजारपेठा मानल्या जातात..Sugar Industry: साखर कारखान्यांवर डिजिटल वजन काटे बसवा.विशेषतः इराण, अफगाणिस्तान, सुदान, सोमालिया, संयुक्त अरब अमिराती श्रीलंका आणि बांगलादेश या देशांकडून भारतीय साखरेला सातत्याने मागणी असते. व्यापार आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत भारताच्या साखर निर्यातीपैकी सुमारे ३० ते ३५ टक्के निर्यात पश्चिम आशिया आणि आफ्रिका बाजारपेठांकडे जाते..पण सध्या प्रमुख खरेदीदार असणाऱ्या इराण, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये युद्ध सुरू असल्याने ही निर्यातही बंद झाली आहे. अन्य देशांतही वाहतूकीच्या समस्या निर्माण असल्याने मागणी थंड आहे. केंद्राने दिलेल्या कोट्यापैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत केवळ तीन ते साडेतीन लाख टन साखरेचे करार झाले होते. यापैकी दोन लाख टनांपर्यंतची साखर प्रत्यक्षात निर्यात झाली होती..Sugar Industry: साखर उद्योगाचे कटू वास्तव.सध्या आखातात समुद्री मार्गे सुरक्षेचे प्रश्न उद्भवल्याने व्यापारी व्यवहारांवर परिणाम होत आहे. साखर निर्यातदारांच्या माहितीनुसार, काही देशांकडून भारतीय साखरेच्या उपलब्धतेबाबत चौकशी होत असली तरी प्रत्यक्ष खरेदीचे करार होत नाहीत. युद्धजन्य परिस्थिती आणि पेमेंट व्यवहारांबाबत असलेली अनिश्चितता यामुळे खरेदीदार सावध भूमिका घेत असल्याचे सांगितले जाते..तज्ज्ञांच्या मते, आखाती प्रदेशातील तणाव दीर्घकाळ टिकल्यास भारतीय साखर उद्योगाला अप्रत्यक्ष आर्थिक फटका बसू शकतो. अजून निर्यात कालावधीसाठी सहा महिन्यांपर्यंत मुदत आहे. यामुळे युद्ध थांबल्यास या देशांकडून मागणी वाढेल असे साखर उद्योगाला वाटते. पण सध्याची अनिश्चितता मात्र साखर निर्यात पू्र्ण थांबवणारी ठरली आहे..पुढील हंगामात साखर उत्पादन घट शक्यपुढील हंगामामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा जादा साखर उत्पादन झाले असले तरी पुढील वर्षी उत्पादनात घट झाल्यास ही साखर देशांतर्गत बाजारात पुरवण्याचे आव्हान केंद्रापुढे आहे. यामुळे जरी आंतराष्टीय बाजारात साखरेचे दर वाढले तरी त्याहीपेक्षा जादा दर स्थानिक बाजारात राहू शकतात. परिणामी केंद्राने दिलेला कोटा पूर्ण करण्यात कारखाने कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्त्वाचे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.