Pune News: कापूस आयातीवर शुल्क लागू झाल्याने आयात कापूस महाग पडत आहे. तर दुसरीकडे सीसीआयची खरेदी वेगाने सुरू असल्यामुळे उद्योगांना खुल्या बाजारात कमी कापूस मिळत आहे. सरकी आणि पेंडेचे दरही टिकून आहेत. आयात शुल्क कायम राहिल्यास कापूसदरात आणखी २०० ते ४०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते, असा अभ्यासकांचा अंदाज आहे..कापूस आयातीवर गुरुवारपासून (ता.१) ११ टक्के आयात शुल्क लागू झाले आहे. पहिल्याच दिवशी देशातील बहुतांशी बाजारात कापसाच्या दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली. हा कल टिकून आहे. देशातील बाजारात कापसाची आवकही कमीच आहे. सध्या रोज दोन लाख गाठींच्या दरम्यान आवक होत आहे. बाजारात आवक होणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी खरेदी करत आहे. सीसीआयने डिसेंबरपर्यंत ६५ लाख गाठींची खरेदी केली आहे. त्यामुळे दराला आधार मिळत आहे..Cotton Import Duty: कापूस आयातीवर ११ टक्के शुल्क लागू.उत्पादन घटल्याने यंदा सरकीचे दरही चांगले आहेत. पावसामुळे उत्पादन तर कमी झालेच शिवाय गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या सरकीचे दर ३ हजार ५०० ते ४ हजारांच्या दरम्यान आहेत. बाजारातील कापसाची आवक कमी झाल्यानंतर सरकीचीही उपलब्धता कमी होऊ शकते. यामुळे दर टिकून राहतील आणि कापसाला आधार मिळेल, असे अभ्यासकांनी सांगितले..आयात घटण्याची शक्यताकेंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क काढल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत ५० लाख गाठी कापूस आयातीचे सौदे झाले होते. त्यापैकी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशात जवळपास ३२ लाख गाठींच्या दरम्यान आयात झाली आहे. पण आयात शुल्क लागू झाल्याने पुढील काळात आयात कमी होण्याची शक्यता आहे..Cotton Farming: मराठवाड्यातील शेतकरी पिकवतोय ‘सोनेरी’ कापूस.दरवाढीचे संकेतदेशातील बाजारात कापसाचे भाव सध्या प्रति क्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर कापूस खंडीचे भाव ५३ हजार ते ५५ हजार आहेत. आयात कापूस खंडी ५२ हजार ते ५५ हजारांच्या दरम्यान पडणार आहे. सरकीचे भावही ३५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तर सरकी पेंड ३२०० ते ३५०० रुपयाने विकली जात आहे. या सर्व घडामोडी कापूस दरात सुधारण्याचे संकेत देत आहेत..सध्या आयात शुल्क लागू असले तरी पुढील आठवडाभरात सरकारचा निर्णय बदलूही शकतो, अशी चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. त्यामुळे कापूस खरेदी दराविषयी सावध भूमिका घेतली जात आहे. सरकारने पुढील आठवडाभरात कोणताही निर्णय घेतला नाही आणि आयात शुल्क कायम रहिले तर दराला आधार मिळेल. आयात कापसाचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे आयात कमी होईल. दुसरीकडे सीसीआय हमीभावाने खरेदीसाठी बाजारात आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील दरही हमीभावाच्या दिशेने वाटचाल करतील. कापसाचा भाव २०० ते ४०० रुपयांनी वाढू शकतो, असा अभ्यासकांचा अंदाज आहे..सीसीआयच्या खरेदीमुळे देशात आधीच कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त होते. आता कापूस आयातीवर ११ टक्के शुल्क लागू झाल्याने आयात कापसाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे देशातही कापसाचे भाव वाढणार आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सीसीआयने कापूस खरेदी केला आहे. आता संकटातील उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाने कापूस विकावा. असे केले तरच उद्योगांना दिलासा मिळेल.अतुल गणात्रा, माजी अध्यक्ष, काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.