Agri Market Crisis: कांद्याची आवक होणाऱ्या जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार कामकाज होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारकोंडी झाली आहे. ‘व्यापाऱ्यांना बाहेरगावी जायचे आहे’ आणि ‘मजूर उपलब्ध नाहीत’ अशी तकलादू कारणे देत अनेक बाजार समित्यांमध्ये ७ ते ८ दिवस लिलाव बंद राहतील, असे बाजार समिती संदेशाद्वारे जाहीर केले आहे. बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांच्या मनमानीला दिलेली ही मूक संमती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे..पणन संचालनालयाच्या स्पष्ट आदेशानुसार, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशिवाय बाजार समित्या तीन दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवता येत नाहीत. मात्र, नाशिकमध्ये कांदा आवकेसाठी प्रमुख बाजार समित्यांनी जवळपास विविध कारणे देत तीनपेक्षा अधिक दिवस लिलाव बंद ठेवले आहेत. लासलगावमध्ये २७ मार्च रोजी व्यापाऱ्यांना वैयक्तिक कामासाठी बाहेर जायचे असल्याच्या कारणावरून लिलाव थांबवण्यात आले. या प्रकारामुळे ‘बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी आहेत की व्यापाऱ्यांच्या सोईसाठी?’ असा सवाल उपस्थित होत आहे..मार्चअखेर बँकांचे हप्ते आणि सोसायट्यांची कर्जे भरण्यासाठी शेतकऱ्याला पैशांची नितांत गरज आहे. जिल्ह्यातील कांद्याची सरासरी आवक दीड लाख क्विंटलपर्यंत असते. अशा वेळी आठवडाभर लिलाव बंद राहिल्याने कांद्याचे लिलाव सुरू होऊन आवक वाढल्यास दर पडण्याची भीती आहे. त्यामुळे व्यापारी अर्जावरून कामकाज बंद ठेवणे म्हणजेच बाजार समित्यांच्या व्यवस्थापनाने पद्धतशीर मौन धारण केले आहे. तर प्रशासनाने देखील याकडे डोळेझाक केली आहे का? हा सवाल उपस्थित होत आहे. व्यापाऱ्यांच्या या ‘सिंडिकेट’ला लगाम लावण्यात प्रशासन दर वर्षी अपयशी ठरल्याचे अनुभवायला मिळत आहे..Onion Farmer Crisis: कांदा पिकामध्ये सोडल्या मेंढ्या.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मनमानीमार्चअखेर व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार जवळपास आठवडाभर बाजार समिती विविध कारणांनी बंद ठेवण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या मुद्द्यावर जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की या प्रकरणी बाजार समित्यांकडून खुलासा मागविला जाईल, त्यानुसार तो अहवाल वरिष्ठांकडे पाठवून नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने व्यापारी मनमानी करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Onion Care in Rain: गारपीट आणि अवकाळीमध्ये कांदा पिकाचे नियोजन कसे करावे?.बाजार समित्यांच्या बंदचा कालावधीबाजार समिती बंद कालावधीलासलगाव २६ मार्च ते १ एप्रिलपिंपळगाव बसवंत ३० मार्च ते १ एप्रिलसिन्नर २८ मार्च ते २ एप्रिलयेवला २८ मार्च ते २ एप्रिलसटाणा ३० मार्च ते ३ एप्रिलनामपूर ३० मार्च ते ५ एप्रिलनांदगाव ३० मार्च ते ३ एप्रिलकळवण ३० मार्च ते ५ एप्रिलमुंगसे (मालेगाव) ३१ मार्च ते ५ एप्रिल.मार्चअखेरच्या नावाखाली बाजार समित्या सलग बंद ठेवणे हा शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रकार आहे. जाणूनबुजून बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. राज्याचा सहकार व पणन विभाग नेमका कोणासाठी काम करतोय, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे. शेतकरी अडचणीत असताना प्रशासन झोपेचे सोंग घेत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना