Jalgaon News: खानदेशात केळीदरांचा तिढा तयार झाला आहे. खरेदीदार कमी दरात किंवा जाहीर दरांपेक्षा कमी दरात केळीची खरेदी करीत आहेत. यासंबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील प्रशासन व जळगाव जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक येत्या शुक्रवारी (ता.२९) भुसावळ येथे होणार आहे. .यासंबंधी शेतकऱ्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी केली जात आहे. खानदेशात बऱ्हाणपूर येथील लिलावात जे दर जाहीर होतात, त्यानुसार केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जात आहे. यात बऱ्हाणपुरात केळीची किमान दरपातळी ६०० रुपयांपर्यंत आहे. तर कमाल दरपातळी १६०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल, अशी आहे..Banana Farmers : केळी उत्पादकांना फक्त विमा योजनेचाच आधार.पण खानदेशात दर्जेदार केळीची खरेदी करताना कमाल दर १००० ते १२०० रुपये प्रति क्विंटल, असा दिला जात आहे. बऱ्हाणपुरातील केळी दर अतिशय कमी आहेत. तेथेच केळी दरांबाबत चुकीचे निर्णय घेतले जात आहेत..Banana Plantation : केळी लागवडीसाठी दर्जेदार कंद मिळेनात.खरेदीदार, व्यापारी यांची मिलीभगत आहे. या दरांबाबत नियंत्रण आणले जावे व केळीचे योग्य दर फलक असावेत, त्याच दरात केळीची खरेदी केली जावी, खरेदीदार फसवणूक करीत आहेत. व्यापारी चुकारे किंवा पैसे देताना लूट करीत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केल्या..त्याची दखल घेत महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा केली. तसेच बऱ्हाणपूर आणि जळगाव येथील प्रशासनाची बैठक घेण्याचे निर्देश दिले. यानुसार ही बैठक होणार आहे. त्यात केळी उत्पादक, कृषितज्ज्ञ, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.