Ahilyanagar News : बाजारात सध्या लिंबाची आवक बऱ्यापैकी होत असली, तरी दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात दहा रुपयाला दोन लिंबे मिळत होती. तेच आता दहा ते वीस रुपयाला किलोभर लिंबे मिळत आहेत. लिंबाच्या उत्पादनात वाढ झाली, तरी दर कमी झाल्याचा मात्र शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे..अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड व दुष्काळी पट्टा असलेल्या भागात लिंबाचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे अहिल्यानगर, कर्जत, श्रीगोंदा बाजार समितीत लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. .Lemon Crop Insurance : लिंबू पिकासाठी विमा .सध्या अहिल्यानगर बाजार समितीत ३० ते ५० क्विंटलपर्यंत आवक होत असून प्रति किलोला १० ते २५ व सरासरी २० रुपये दर मिळत आहे. उन्हाळ्यात लिंबाचे दर थेट शंभर ते दीडशे रुपये किलोच्या पुढे गेले होते..Lemon Farming : लिंबू पिकाला योग्य प्रमाणात सेंद्रिय, रासायनिक खते द्या.यंदा उन्हाळ्यात पाऊस झाला. त्यानंतरही वातावरण आणि पावसाची स्थिती चांगली आहे. त्यामुळे लिंबाच्या झाडांना पोषक वातावरण मिळाल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाजारात आवक वाढल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त आहे, यामुळे दरात घट झाली असल्याचे शेतकरी सांगतात..श्रावण आणि गणेश उत्सव पार पडल्यानंतर आता पितृपक्ष येत आहे. त्यानंतर नवरात्र आहे. या काळात लिंबाला अधिक मागणी असते, त्यामुळे या काळात दर वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. उन्हाळ्यात आकाशाला भिडलेल्या लिंबाच्या किमती आता खाली आल्याने ग्राहक काहीसा सुखावला असला तरी शेतकरी मात्र दर पडल्याने काहीसे नाराज आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.