Indian Agriculture Market: देशातील बाजारात सध्या कापूस आणि सोयाबीनच्या भावात तेजी दिसत आहे. पण तूर आणि हरभऱ्यासह इतर शेतीमालाच्या दरात वाढ झालेली नाही. यंदाच्या खरिपावर एल निनोमुळे कमी पावसाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर खरिपातील प्रमुख पिकांचे बाजारभाव काय राहतील, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे..देशातील बाजारात सध्या कापूस आणि सोयाबीनच्या भावात तेजी दिसून येत आहे. युद्धामुळे निर्माण झालेली स्थिती आणि जोडीला कमी उत्पादन यामुळे ही तेजी दिसत आहे. तर कडधान्यासह काही शेतीमालाचे भाव सध्याही दबावातच आहेत. .Crop Loan Limit: यवतमाळ जिल्ह्यासाठी पीककर्ज मर्यादेत हेक्टरी वाढ.देशात सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत अधिक आहे. तर कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत कमी प्रमाणात वाढला आहे. सध्या तरी कापूस आणि सोयाबीन या आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या शेतीमालाच्या भावात युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अपेक्षेपेक्षा जास्त तेजी दिसत आहे. या तेजीची पाळेमुळे आणि भविष्यातील परिस्थितीचा बारकाईने विचार केल्यास भावपातळी पुढील काळातही गेल्या वर्षभरापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे..पांढऱ्या सोन्याला झळाळीकापसाच्या भावात आलेल्या तेजीच्या कारणांचा आढावा घेऊ. एक तर युद्धामुळे कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाली. त्यामुळे मानवनिर्मित कापड अर्थात पाॅलिस्टर आणि रेयॉन महागले. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात कापड निर्मितीसाठी मानवनिर्मित धागा आणि कापसाचा धागा यांच्या वापराचे प्रमाण बदलत गेले. पाॅलिस्टरचे भाव कच्च्या तेलाच्या भावासोबत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे कापड निर्मितीसाठी पाॅलिस्टरचे प्रमाण कमी होत कापसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कापसाच्या भावातही वाढ झाली आहे. .आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. युद्ध सुरू होण्याआधी कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ६३ सेंट प्रति पाउंडच्या आसपास होता. गेले वर्षभर कापूस याच पातळीच्या भोवती फरत राहिला होता. परंतु युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पाॅलिस्टरचे भाव वाढत गेले आणि कापसालाही आधार मिळत गेला. युद्धानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे..अमेरिकेतील कापूस उत्पादक पट्ट्यातील कमी पावसामुळेही भाववाढीला फोडणी मिळाली आहे. भारतात आधीच कापसाचे उत्पादनात घट आलेली होती. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चांगली तेजी आली. त्यामुळे कापसाचे भाव वधारले. परंतु आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशातील बाजारात झालेली वाढ कमी होती. देशातील बाजारात कापूस २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढला. युद्धामुळे शेजारचे देश भारताकडून सूत आणि कापसाची खरेदी खरेदी करत आहेत. कापडालाही चांगली मागणी आहे..युद्धानंतर कापसाला मागणी वाढल्याने दरात तेजी आली आहे. युध्द सुरु होण्याआधी देशात कापसाचा भाव सरासरी आठ हजारांच्या दरम्यान होता. तो आता सरासरी नऊ हजारांवर गेला आहे. तर कमाल भावाच्या बाबतीत कापसाने यंदाही १० हजारांचा टप्पा गाठला आहे. पण भाव सध्याच्या पातळीवरून पुढे सरकला नाही. कापूस सरासरी नऊ हजार रुपये झाल्यानंतर कापसाला उठाव कमी झाल्याचे उद्योगांनी सांगितले. त्यामुळे तीन आठवड्यांपासून बाजार सध्याच्या पातळीवर स्थिरावला आहे..आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाने दोन वर्षांनतर ८८ सेंट प्रति पाउंडचा टप्पा गाठला होता. शुक्रवारी कापूस भाव हंगामातील उच्चांकी दरावरून खाली येत बाजार ८० सेंटवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढीला लगाम बसल्याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसून आला. अमेरिकेत कापसाची लागवड सुरू आहे. लागवडीचा वेगही चांगला आहे. अमेरिकेत यंदा कापूस लागवड वाढत असली, तरी उत्पादकता कमी राहण्याची शक्यता आहे. जागतिक कापूस उत्पादनात २०२६-२७ मध्ये घट येण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला आहे. .अमेरिका, चीन, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियात कापूस उत्पादन कमी राहणार असल्याचे म्हटले आहे. भारतात सध्या तरी उत्पादन काहीसे अधिक राहण्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी कमी पावसाच्या सावटामुळे उत्पादन कमीच राहण्याची शक्यता आहे. जागतिक उत्पादनाचा अंदाज लक्षात घेऊन अमेरिकेत कापसाचा भाव ७३ सेंट प्रति पाऊंड अर्थात गेल्या वर्षीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. देशातही यंदा कापूस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कापसाचा भाव हमीभावाच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे..Kharif Crop Loan Rates: नांदेडला पिकांसाठी पीककर्ज दर निश्चित.सोयाबीनमध्ये तेजीचा कलदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव गेल्या तीन वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेले आहे. सोयातेलाच्या भावात वर्षभरात ५१ टक्के, तर युद्ध सुरू झाल्यानंतर ३० टक्के वाढ झाली आहे. सोयातेलाचा दर सध्या अडीच वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे..आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव २० टक्के वाढला; पण देशात ४० टक्क्यांनी भाव वाढला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यंदा देशातील उत्पादन कमी झाले होते. गेल्या हंगामातील शिल्लक सोयाबीनचे प्रमाणही कमी होते. याचा सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला. सध्या देशात सोयाबीनचा पुरवठा कमी आहे. जागतिक बाजारात नाॅन जीएम सोयाबीन कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातच आयातीचा खर्च वाढलेला आहे. .वाढलेल्या भावातही सोयापेंडची निर्यात चांगली सुरू होती. त्यामुळे देशात सोयाबीनच्या भावात तेजी आली. सध्या बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजारांच्या आसपास भाव मिळत आहे. पण वाढलेल्या भावात आता सोयाबीनला मागणी कमी येत असल्याचे प्रक्रियादारांनी सांगितले. त्यामुळे भावात काहीसे चढ-उतार सुरू आहेत. दरवाढीवर सध्या तरी मर्यादा दिसत आहेत..सोयाबीनचे विक्रमी उत्पादन?नव्या हंगामात जागतिक बाजारात सोयाबीनचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. ब्राझील, अमेरिका, अर्जेंटीना आणि चीनमध्ये सोयाबीन उत्पादन वाढीचा अंदाज आहे. ब्राझील यंदा विक्रमी १८६० लाख टन सोयाबीनचे उत्पादन घेईल, अशी शक्यता यूएसडीएने व्यक्त केली आहे. जागतिक सोयाबीनचे उत्पादन विक्रमी ४ हजार ४१५ लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर वापरही वाढून ४ हजार ४०० लाख टन होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे गाळप विक्रमी ३ हजार ८३१ लाख टनांवर पोहोचण्याची चिन्हे आहेत. म्हणजे केवळ उत्पादनच नाही तर सोयाबीनचा वापरही विक्रमी पातळीवर राहण्याचा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला आहे. .सोयाबीनचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतरही सोयाबीनचा अमेरिकेतील बाजारातील सरासरी भाव गेल्या वर्षीपेक्षा अधिक राहील, असेही यूएसडीएने म्हटले आहे. जागतिक पातळीवर उत्पादनाची अशी स्थिती असली, तरी देशात मात्र उत्पादन घटण्याचे चित्र आहे. यंदा ‘एल निनो’मुळे कमी पावसाचे सावट आहे. त्यामुळे नव्या हंगामातील उत्पादन कमीच राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सलग दुसऱ्या वर्षी सोयाबीन उत्पादन कमी राहणार आहे. त्यातच नव्या हंगामासाठी सोयाबीनचा शिल्लक साठा नगण्य आहे. त्यामुळे पुढील हंगामातही सोयाबीनचा पुरवठा टाईट राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव गेल्या वर्षभराच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता आहे. सोयाबीन पुढील काळात हमीभावाच्या पुढेच जास्त काळ राहण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे..कडधान्य बाजावर दबावदेशातील कडधान्य बाजार सध्याही दबावातच आहे. हरभऱ्याची बाजारातील आवक चांगल्या प्रमाणात सुरू आहे. याचा दबाव दरावर आहे. तुरीची आवक सध्या कमी झालेली आहे. काही बाजारांमध्ये तुरीच्या भावात सुधारणाही दिसून आली आहे. पण अपेक्षित तेजी अद्याप दिसली नाही. तुरीचे उत्पादन सलग तिसऱ्या वर्षी कमी झालेले आहे. देशात साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. असे असतानाही तुरीच्या भावात अपेक्षित वाढ झालेली नाही. तुरीचे भाव वाढण्यास सर्व परिस्थिती अनुकूल आहे..पण शेतकऱ्यांचा माल बाजारात येत आहे आणि सरकार आयातीसाठी आक्रमक धोरण राबवत आहे, या कारणांनी सध्या दबाव दिसून येत आहे. पण खरीप हंगामात तुरीची लागवड नेमकी किती होते, तसेच पीक वाढीच्या काळात परिस्थिती अनुकूल राहते का यावर बाजारातील गणिते ठरणार आहेत. परिस्थिती नव्या हंगामातील पिकाला पोषक नसल्याचे स्पष्ट झाल्यास तुरीच्या भावात आतापर्यंत अपेक्षित असलेली तेजी दिसू शकते, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. हरभरा, उडीद, मूग आणि मसूरच्या भावालाही या परिस्थितीचा आधार मिळू शकतो, असा त्यांचा अंदाज आहे..‘एल निनो’चा पाऊसमानावर परिणाम दिसू लागल्यानंतर कडधान्यांसह सर्वच शेतीमालाच्या भावात वाढ होईल, असे जाणकारांनी सांगितले. पुढील वर्ष- दीड वर्षात शेतीमालाचे भाव चांगले राहण्यासाठी पोषक स्थिती सध्या तरी दिसते आहे, असा त्यांचा होरा आहे.(लेखक ॲग्रोवन डिजिटलचे कंटेन्ट लीड आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.