Solapur News: इराण आणि इस्राईल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्ध अधिक तीव्र झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या संघर्षामुळे जिल्ह्याची निर्यातक्षम द्राक्षे आणि केळीची बाजारपेठ ठप्प झाली असून, सुमारे ४०० टन द्राक्ष आणि १२०० टनांहून अधिक केळी सध्या कोल्ड स्टोअरेजमध्ये निर्यातीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. परिणामी, शेतकऱ्यांसह निर्यातदार व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे..राज्यात सर्वाधिक केळी उत्पादन करणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. जळगावच्या बरोबरीने सोलापूरही आता केळीमध्ये आघाडीवर आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात केळीचे क्षेत्र २० हजार हेक्टरच्याही पुढे आहे. त्यापैकी ८० टक्के केळींची निर्यात होते आहे. जिल्ह्यातील करमाळा, टेंभुर्णी, पंढरपूर, माळशिरस, अकलूज, माढा भागातून प्रति दिवस १२०० टन केळीची निर्यात होते आहे..पण गेल्या पाच दिवसांपासून ही सर्व प्रक्रिया थांबली आहे. सौदीअरब, इराण, इराक, कुवेत, कतार ही केळीची मुख्य बाजारपेठ आहे. पण या देशात युद्ध सुरू असल्याने आतापर्यंत जवळपास ६००० टन केळीची निर्यात ठप्प झाली आहे. त्याशिवाय प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतावर कटिंग होणारी केळी वेगळीच आहे..Agricultural Export Crisis: कांदा, द्राक्ष, केळीची निर्यात ठप्प.सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा या भागांत जवळपास १५ हून अधिक कोल्डस्टोरेज आहेत. पण ती सध्या फुल्ल झाली आहेत. पुढे माल जाऊच शकत नसल्याने आलेली केळी ठेवायची कुठे आणि विकायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे..केळीबरोबरच द्राक्षाचीही मोठी निर्यात जिल्ह्यातून होते. द्राक्षाचे २५ हजार हेक्टरवर क्षेत्र जिल्ह्यात आहे. सोलापूर जिल्ह्यातून विशेषतः पंढरपूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा परिसरातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मात्र, सध्याची स्थिती पाहता सुमारे ४०० टन द्राक्षे कोल्ड स्टोअरेजमध्ये आहेत. आखाती देशाशिवायही अधिक युरोपिय देशात द्राक्षांची निर्यात होते, पण त्याचा अप्रत्यक्ष फटका द्राक्ष निर्यातीला बसला आहे. .Rice Exports: इस्रायल- इराण युद्धामुळे बासमती तांदूळ निर्यातीला फटका, भारतीय निर्यातदार चिंतेत.जिल्ह्यातून निर्यातीसाठी सज्ज असलेले सुमारे ४०० कंटेनर्स युद्धामुळे मुंबईत ‘जेएनपीए’त रखडले आहेत. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे आणि परिसरातील कोल्ड स्टोअरेज केंद्रांच्या बाहेर सध्या निर्यातीसाठी सज्ज असलेली वाहने उभी आहेत. परदेशात माल पाठवण्याऐवजी आता स्थानिक बाजारपेठेत तो विकण्याची वेळ आली आहे,.निर्यातदारांची कोंडीया युद्धामुळे आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक प्रभावित झाली आहे. मुंबईतील जेएनपीए (जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी) बंदरातून निर्यात होणारा हजारो कंटेनर शेतीमाल मागच्या ४-५ दिवसांपासून अडकून पडला आहे. होर्मुझची खाडी आणि लाल समुद्रातील असुरक्षिततेमुळे शिपिंग कंपन्यांनी बहारीन, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया आणि यूएई सारख्या देशांतील ‘कार्गो’ लोड करणे थांबवले आहे. ज्या कंपन्या जोखीम पत्करत आहेत, त्यांनी मात्र ‘आणीबाणी संघर्ष अधिभार’ लागू केला आहे. त्याचे दर कंटेनर आणि त्यातील वजनानुसार प्रतिदिन जवळपास दीड-दोन ते तीन लाखांपर्यंत आहेत. त्यामुळे ही झळ सोसणे निर्यातदारांना अवघड झाले आहे. परिणामी, त्यांची पुरती कोंडी झाली आहे..युद्धामुळे वाहतुकीचे दर वाढले असून, विमा खर्चातही मोठी वाढ झाली आहे. शिवाय पुढे मालच उचलला जात नसल्याने अडचण झाली आहे. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह आम्हा निर्यातदारांचे नुकसान लाखो-कोट्यवधी रुपयांच्या घरात जाण्याची भीती आहे.किरण डोके, केळी निर्यातदार, केडी एक्सपोर्टर्स, कंदर, ता. करमाळा.आमचा माल तयार आहे, पण युद्धामुळे जहाजांचे मार्ग बदलले किंवा थांबले आहेत. यामुळे माल खराब होण्याची भीती वाढली आहे. स्थानिक बाजारातही आता कितपत उठाव मिळेल, ही शंका आहे. अप्पा धनके, द्राक्ष निर्यातदार आणि शेतकरी, उळे, ता. दक्षिण सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.