New Delhi News : ‘‘साखर उद्योगाकडून मागणी होत असलेल्या साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल,’’ असे आश्वासन केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी (ता.१८) दिले. .नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.मंत्री जोशी म्हणाले, की केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या २०२५-२६ साखर हंगामासाठी १५ लाख टन साखर निर्यातीला मान्यता दिली आहे. याबरोबरच आणि किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढविण्याच्या उद्योगाच्या विनंतीवर सरकार विचार करत आहे..Sugar Price : साखर विक्री दरवाढीचा विचार करू; केंद्रीय मंत्री जोशींनी केले स्पष्ट .‘‘२०२४-२५ हंगामात १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिल्यानंतर किमती स्थिर राहिल्या. आता आम्ही २०२५-२६ हंगामासाठी १५ लाख टन साखर निर्यातीला मान्यता दिली आहे,’’ असेही श्री. जोशी यांनी सांगितले..Sugar Industry: राज्यात सर्वाधिक १७० कारखाने सुरू.ते म्हणाले, की मंत्रालय साखरेच्या किमतीचे मूल्यांकन निर्यातीनुसार करेल आणि नंतर किमान विक्री किंमत वाढवण्याच्या मागणीवर विचार करेल. २०२४-२५ च्या मार्केटिंग वर्षात (ऑक्टोबर-सप्टेंबर) भारताने सुमारे आठ लाख टन साखर निर्यात केली, जी वाटप केलेल्या १० लाख टनांपेक्षा थोडी कमी आहे..दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी(ता.१६) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांना साखरेच्या किमान आधारभूत किमतीत सुधारणा करण्याची विनंती केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.