सोयाबीन भाव वाढलेसोयाबीनच्या भावात मागील काही दिवसांपासून चांगली वाढ झाली आहे. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ६ हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मागील २ दिवसांमध्ये प्रक्रिया प्लांट्सच्या भावात २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव देशभरात ५ हजार ७५० ते ५ हजार ९०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. तर बाजार समित्यांमध्येही सोयाबीन हमीभावाचा टप्पा पार करून ५५०० रुपयांकडे वाटचाल करत आहेत. आज अनेक बाजारात सोयाबीन ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापूस टिकूनदेशातील बाजारात कापसाचे भाव मागील दोन आठवड्यांपासून टिकून आहेत. कापसाची बाजारातील आवक कमची आहे. कापूस दरवाढीसाठी पोषक हवामान आहे. मात्र सीसीआयची कापूस विक्री सुरु झाली आहे. सीसीआय कमी भावात कापूस विकत आहे. यामुळे कापूस दरवाढ थांबली आहे. सध्या कापूस भाव बाजारात ८ हजार ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. सरकीच भाव ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. सीसीआयची कापूस विक्रीचे भाव स्थिर आहेत तोपर्यंत कापूसही स्थिर दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सरकीचे भाव स्थिर; सोयाबीनमध्ये सुधारणा, कापूस दर टिकून, मुगाचा भाव दबावातच तर गव्हाचे भाव टिकून.आल्याचे दर स्थिरराज्यातील बाजारात आल्याची आवक सरासरीएवढी होत आहे. तर आल्याला उठावही चांगला आहे. याचा परिणाम आल्याच्या भावावर दिसून येत आहे. आले उत्पादनाला यंदा फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा आधार भावाला मिळत आहे. सध्या आले प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. आल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे. आल्याला उठाव मात्र पुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे आल्याच्या भावालाही चांगला आधार राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस भाव स्थिर, कांदा भाव स्थिरावले, उडदाचे भाव दबावातच, गवारचा भाव तेजीतच .गाजराची आवक सुधारलीराज्यातील काही बाजारांमध्ये गाजराची आवक मागील काही आठवड्यांपासून सुधारली आहे. तर गाजराला उठावही चांगला आहे. परिणामी गाजराचे दरही टिकून आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि अमरावती बाजारात गाजराची आवक सरासरीपेक्षा काहीशी अधिक दिसत आहे. तर इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. सध्या गाजर बाजारात प्रतिक्विंटल १५०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. गाजराचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..पपईला उठावराज्यातील बाजारात पपईची आवक सध्या कमीच आहे. तर थंडी आणि उकाड्यामुळे पपईला चांगला भाव मिळत आहे. पपईची अनेक बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. राज्यातील केवळ मुंबई, पुणे, अमरावती बाजारात अधिक आवक आहे. इतर बाजारांमध्ये आवक २० ते ५० क्विंटलच्या आतच होत आहे. त्यामुळे पपई प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. पपईची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहून दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.