Global Edible Oil Market: अमेरिका- इस्राईल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे खाद्यतेलाच्या आयातीत मोठी घट झाली आहे. त्याचाच फटका बसत गेल्या वीस दिवसांत तेलाच्या किमतीत तब्बल दोनवेळा वाढ नोंदविण्यात आली. सध्या प्रति किलो आठ रुपयांनी तेलाचे दर वधारले आहे. युद्धजन्य स्थिती कायम राहिल्यास या पुढील काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यापारी स्तरावर वर्तविली जात आहे..भारत आपल्या गरजेच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करतो. देशांतर्गत उत्पादनापेक्षा मागणी कितीतरी जास्त असल्याने भारताला गरजेच्या सुमारे ६० टक्के तेलाची आयात करावी लागते..Edible Oil Crop: तेलबिया पिकांना दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मक्याला पसंती; केंद्र सरकारने लोकसभेत दावा फेटाळला.प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियातून पाम तेल, अर्जेंटिना व ब्राझीलमधून सोयाबीन तेल तर रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची मोठी आयात केली जाते. मात्र, सध्याच्या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. मालवाहू जहाजांच्या वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. याचा परिणाम नागपूरच्या ठोक आणि किरकोळ बाजारावर स्पष्टपणे दिसत आहे..व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंगदाणा तेलाचा डबा (१५ किलोचा) जो पूर्वी २५६० रुपयांना मिळत होता, तो आता २८०० रुपयांवर पोहोचला आहे. सोयाबीन तेलाचा डबा २३०० रुपयांवरून २५५० रुपये तर सूर्यफूल तेलाचा डबा २२५० रुपयांवरून थेट २६०० रुपयांवर गेला आहे. वीसच दिवसांत झालेली ही दरवाढ सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी आहे..Edible Oil Mission: खाद्यतेल अभियानातून मिळणार सव्वा कोटी .केवळ जागतिक युद्धच नाही, तर देशांतर्गत वाहतूक व्यवस्थेलाही याचा फटका बसला आहे. डिझेलच्या टंचाईमुळे मालवाहतूक थंडावली असून मालाची आवक मंदावली आहे. अनेक ठिकाणी दोन ते तीन दिवसांच्या विलंबाने मालाची आवक होत असल्याने व्यापारीही मोठ्या अडचणीत सापडले आहेत..मागणीच्या तुलनेत साठा अपुरा असल्याने दरात सतत वाढ होत आहे. लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या दिवसांत खाद्यतेलाच्या दराने गाठलेली ही उच्चांकी पातळी सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ठरत आहे. विशेष म्हणजे याचा तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नसल्याचे सांगितले जाते..युद्धजन्य स्थितीमुळे खाद्य तेलाची आयात कमी झालेली आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या भावात वाढ झालेली आहे. गेल्या वीस दिवसांत प्रति किलो ८ ते १० रुपयांची वाढ झालेली आहे.प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर किरकोळ व्यापारी संघ