Nashik News : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ३ लाख टन कांद्याची खरेदी पाच महिन्यांपूर्वी आटोपली. मात्र जवळपास २५ टक्के शेतकऱ्यांना अद्याप १०० कोटींवर रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजनेमध्ये शेतकरी आर्थिकदृष्ट्या नडला जात आहे. यामागे ग्राहक व्यवहार विभागाचा आडमुठेपणा असल्याचे पैसे थकलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिल्लीत गेलेले शेतकरी आणि खरेदीदार संस्था आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते..गेल्या सहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’कडे कांदा विक्री केला. त्यावेळी ७२ तासांच्या आत पैसे देण्याची घोषणा होती. मात्र प्रत्यक्षात ती हवेत विरल्याची वस्तुस्थिती आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कांदा खरेदीत गोंधळ असल्याने राज्य सरकारने देखील सहकार विभागाच्या माध्यमातून दक्षता समिती नेमली..Onion Payment Pending: कांद्याच्या थकित देणीविषयी शरद पवारांकडे मांडली कैफियत.तिच्या कामकाजात मोठा गोंधळ आहे. खरेदी आटोपल्यानंतर साठ्याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, भारतीय अन्न महामंडळासह ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेसोबत खरेदी केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये काही ठिकाणी साठा कमी असल्याचे वास्तव समोर आले..मात्र खरेदी प्रक्रिया संपल्यानंतर २ महिन्यांनी ग्राहक व्यवहार विभागाच्या तपासणीत खरेदी केंद्रांवर माल कमी आढळून आला. प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची सर्व प्रक्रिया पडताळणी करून खरेदी व साठ्याचे तपशील याच विभागाच्या ‘सप्लाय व्हॅलिड’ पोर्टलवर आहेत. मग पैसे का थकवले? असा सवाल शेतकऱ्यांचा असून संताप वाढत आहे..प्रत्यक्षात ग्राहक व्यवहार विभागाकडून नेमलेल्या निरीक्षकांच्या माध्यमातून तसेच देखरेखीत कांदा गुणवत्ता व वजनमाप पडताळणी झाली. हाच कांदा वजन करून चाळीत साठवणूक करण्यात आला. या संबंधी खरेदी व साठवणुकीचे अहवाल वेळोवेळी देण्यात आले. मात्र तरीही पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी व खरेदीदार संस्थांच्या प्रतिनिधींनी दिल्ली गाठली आहे..Onion Nursery: कांदा रोपवाटिका बहरल्या, रोपांना मागणी.मंत्री शेतकऱ्यांची मागणी गांभीर्याने घेईना?कांदा विक्री केल्यानंतर पैसे मिळत नसल्याने अखेर शेतकरी आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी तीन दिवसांपासून थेट दिल्ली गाठली आहे. मंगळवारी (ता. ९) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ‘नाफेड’च्या वरिष्ठ व्यवस्थापनाची भेट घेतली. याच मुद्द्यावर खासदार नीलेश लंके यांनी देखील संसदेत कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केला. मात्र यावर अपेक्षित उत्तरे मिळाले नाही. तर बुधवारी (ता. १०) शेतकरी ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटीसाठी गेले होते. .मात्र येथे शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला नसल्याची समजते. तर ‘एनसीसीएफ’च्या दक्षता पथकाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. मात्र व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी भेट टाळली. अखेर अध्यक्ष विशाल सिंग यांनाही संपर्क साधल्याचे समजते. शेतकऱ्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा शब्द दिला. मात्र संबंधित मंत्री याकडे अजूनही गांभीर्याने पाहत नसल्याने शेतकरी संतप्त असून शेतकरी आणि खरेदीदार संस्था आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.