Pune News: केंद्र सरकारने गव्हाच्या बाजारावरील कासरा आणखी आवळला. गव्हाच्या साठा मर्यादेत सरकारने पुन्हा कपात केली. घाऊस व्यापारी आता केवळ २ हजार टन तर किरकोळ व्यापारी केवळ ८ टनांचा साठा ठेऊ शकतात. कमी केलेली साठा मर्यादा ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू असणार आहे. सणासुदीच्या काळात गव्हाचे भाव वाढू नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने म्हटले आहे. .केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अधिसूचना काढून गव्हाच्या साठा मर्यादेत कपात केली. सरकारने गेल्यावर्षी साठा मर्यादा लावली आणि वेळोवेळी मर्यादा कमी केली. विशेष म्हणजे यंदा देशात गव्हाचे उत्पादन वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. देशात १ हजार १७५ लाख टन गहू उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. तसेच यंदा सरकारची गहू खरेदी वाढून ३०० लाख टनांवर पोचली. तरीही सरकारने देशातील गहू बाजारावरील कासरा आणखी आवळला. .Wheat Price: गव्हाचे दर स्थिर; तसेच काय आहेत भेंडी, ज्वारी, बेदाणा आणि हरभऱ्याचे आजचे बाजारभाव .विशेष म्हणजे सध्या गव्हाचे भाव फारकाही वाढलेले नाहीत. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या माहितीनुसार, गव्हाचा सरासरी भाव ३२ रुपयांच्या दरम्यान आहे. तर गहू पीठाचा भाव ३७ रुपये किलो आहे. मागील दोन आठवड्याच्या तुलनेत सध्याचा भाव काहीसा कमी आहे. तर गेल्या महिन्यातील पातळीच्या जवळपास आहे. गेल्यावर्षीचा विचार केला तर सध्याचे भाव अडीच ते ३ टक्क्यांनी अधिक आहेत. तरीही सरकारने गव्हाचे भाव कमी करण्यासाठी साठा मर्यादा कमी केली. .Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, गहू स्थिर, भेंडीला चांगला उठाव, ज्वारीला मागणी कायम तर हरभऱ्याचा बाजार टिकून.अशी असेल साठा मर्यादाघाऊक व्यापारी आता केवळ २ हजार टन साठा आपल्या गोदामांमध्ये ठेऊ शकतात. ही मर्यादा ३ हजार टनांची होती. प्रक्रियादार आपल्या प्लांट्च्या एकूण क्षमतेच्या केवळ ६० टक्के साठा ठेऊ शकतात. ज्या पीठ गिरण्यांची महिन्याची क्षमता २ हजार टनांची आहे, त्या पीठ गिरण्या सप्टेंबर ते मार्च २०२६ या काळात महिन्याला ८ हजार ४०० टनांचा साठा ठेऊ शकतात. किरकोळ व्यापारी आपल्या दुकानात केवळ ८ टन गव्हाचा साठा ठेऊ शकणार आहेत. आधी ही मर्यादा १० टनांची होती. तसेच विक्रीसाठी दुकानांची साखळी असलेल्या प्रत्येक दुकानांनाही ८ टनांची मर्यादा देण्यात आली आहे. .सणांमध्ये भाववाढ रोखण्यासाठी निर्णयदेशात यापुढे सणांचा काळ आहे. सणांच्या काळात गव्हाला मागणी असते. त्यामुळे भाव वाढू नये, यासाठी सरकारने साठा मर्यादा कमी केली. या निर्णयामुळे सरकारला देशात अन्नसुरक्षा राखता येईल. तसेच सणांच्या काळात साठेबाजी आणि नफेखोरीला लगाम लावता येईल, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.