Pune News: सीसीआयने अखेर हमीभावाने कापूस खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. राज्यात आता १५ मार्चपर्यंत हमीभावाने कापूस खरेदी होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांनी आपला स्लाॅट बूक करून हमीभावाने कापूस विकावा, असे आवाहन सीसीआयच्या वतीने करण्यात आले आहे..काॅटन काॅर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयने हमीभावाने कापूस खरेदी शुक्रवारपासून (ता.२७) बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याने मुदतवाढीची मागणी केली जात होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह यांना पत्र लिहून ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. .Cotton Price: कापसासाठी भावांतर योजना राबवण्याचा प्रस्ताव नाही, पणनमंत्र्यांची माहिती.पण २७ फेब्रुवारी सायंकाळपर्यंत कापूस मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे दिवसभर बाजारात वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. शेतकऱ्यांमध्येही संभ्रमही तयार झाला होता. अनेक भागातील शेतकऱ्यांकडे अद्यापही ३० टक्क्यांपर्यंत कापूस शिल्लक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण आज सायंकाळी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाणार आहे..सीसीआयचे अध्यक्ष ललितकुमार गुप्ता यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तसेच शेतकरीही मुदतवाढीची मागणी करत होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी वस्त्रोद्योगमंत्री सिंह यांनी कापूस खरेदीला मुदतवाढ दिली आहे..CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही.हमीभावाचा आधार हवादेशातील बाजारात कापसाचा भाव सीसीआयने कापूस विक्री सुरु केल्यापासून कमी झाला आहे. भाव ८ हजार ५०० रुपयांवरून कमी झाले आणि सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर कापसाचा हमीभाव ८ हजार ११० रुपये आहे. हमीभावापेक्षा ८०० रुपयांपर्यंत भाव कमी झाला आहे. एकीकडे सीसीआय कमी भावात कापूस विकून भाव कमी करत आहे. त्यामुळे हमीभावाचा आधार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना किमान हमीभावाने कापूस विक्रीचा पर्याय गरजेचा आहे..राज्यात २५ लाख गाठी खरेदीकापसाचे भाव सुरुवातीपासून कमी असल्याने सीसीआयच्या खरेदीला यंदाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. सीसीआयने आतापर्यंत देशात १०२ लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. यापैकी महाराष्ट्रात २५ लाख ५० हजार गाठी कापसाची खरेदी झाली. तर तेलंगणात ३१ लाख गाठींची खरेदी झाली आहे, अशी माहिती सीसीआयने दिली आहे. मुदतवाढ मिळून खरेदी सुरु झाल्यानंतर राज्यात खरेदी वाढण्याची शक्यता आहे..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह यांच्याकड कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांची मागणी आणि शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन केंद्रीयमंत्र्यांनी १५ मार्चपर्यंत कापूस खरेदीला मुदतवाढ दिली आहे.ललितकुमार गुप्ता, अध्यक्ष, सीसीआय.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.