Pune News: ‘‘देशाला आर्थिक स्थैर्य देणाऱ्या उपक्रमांमध्ये तसेच डिजिटल अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचा सहभाग मोलाचा आहे. मात्र, आता ‘नागरिक देवो भव’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवत बॅंकांनी व्यवहार करावेत,’’ असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला. .‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’च्या ९१ व्या स्थापना दिनानिमित्ताने गुरुवारी (ता. २५) आयोजित सोहळ्यात त्या बोलत होत्या. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू तसेच बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना व्यासपीठावर होते..Global Economy: आली लहर, केला कहर.श्रीमती सीतारामन म्हणाल्या, ‘‘भारतीय अर्थव्यवस्था कोविड आणि जागतिक अस्थैर्यातून यशस्वीरीत्या बाहेर पडलीच; परंतु, जगात सर्वात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था म्हणून देश गौरवास्पद वाटचाल करतो आहे. जागतिक पत मानांकन क्षेत्रातील संस्था आता भारतीय अर्थव्यवस्थेची पत वाढवताना दिसत आहेत. अर्थात, सूक्ष्म पतपुरवठा व्यवस्थेचा विस्तार, पायाभूत सुविधा व डिजिटल सुधारणा तसेच आर्थिक व्यवस्थेतील बदलांमुळे हे शक्य झाले आहे..सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्रची कामगिरी उत्तम ठरते आहे. या बॅंकेने ५५ टक्क्यांचा व्यवहार विस्तार स्वतःच्या राज्याबाहेर करणे हे अजून कौतुकास्पद असल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले. ‘‘बॅंकिंग सेवेसाठी तंत्रज्ञान हे प्रभावी माध्यम आहे. मात्र, ग्राहक विश्वास हाच बॅंकिंग व्यवस्थेचा पाया आहे. त्यामुळे ‘नागरिक देवो भव’ तत्त्व मानून बॅंकांनी सेवा द्याव्यात,’’ असे आवाहन ही त्यांनी केले..Global Economy : डॉलरचा फुगा फुटणार?.श्री. नागाराजू म्हणाले, ‘‘भारतीय बॅकिंग सेवांच्या क्षमतेविषयी यापूर्वी गंभीर शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु अर्थमंत्र्यांची दूरदृष्टी, त्यांनी आणलेल्या सुधारणा व बॅंकांना दिलेली स्वायत्तता यामुळे मोठे बदल झाले. यातून भारतीय आर्थिक व्यवहार व सेवांमध्ये स्थिरता आली आहे. आता सुधारणांचा पुढील टप्पा हा सार्वजनिक बॅंकांच्या बळकटीकरणाचा राहील.’’.कृषी, शिक्षण, सूक्ष्म उद्योगांकडे लक्ष द्याकेंद्रीय अर्थ सचिव एम. नागाराजू यांनी या सोहळ्याच्या निमित्ताने बॅंकिंग क्षेत्रातील उणिवांवरदेखील बोट ठेवले. ‘‘बॅंकिंग व्यवस्थेने सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांना भांडवल पुरवावे. शैक्षणिक कर्जावाचून विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. कृषी क्षेत्र तसेच कृषी प्रक्रिया व्यवसाय, स्टार्टअप यांना सुलभ कर्ज पुरवठा करण्याची दक्षता घ्यायला हवी,’’ अशी सूचना श्री. नागाराजू यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.