Banana Supply Demand: देशात आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशातील अत्यल्प केळी आवक, देशांतर्गत बाजारात खानदेशसह लगतच्या केळीस वाढलेला उठाव आणि आखातातील केळी निर्यात सुरू झाल्याने केळी दरात मागील काही दिवसांत आश्वासक सुधारणा झाली आहे. .केळी दर १२०० ते १३०० रुपये प्रति क्विंटलवरून १८०० ते २१०० रुपये प्रति क्विंटल, असे झाले आहेत. देशात सध्या राज्यात जळगाव, नंदुरबार, धुळे व सोलापुरात केळीची आवक आहे. विदर्भातील काही भागांतही केळी आवक आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, बडवानी, गुजरातमधील कामरेज, राजपिपला, आणंद व बडोदानजीकच्या भागांसह आंध्र प्रदेशातही केळीची अल्प आवक आहे. खानदेशातील केळीस उत्तरेकडे मोठी बाजारपेठ आहे. .Banana Prices: केळी दरात सुधारणा दिसेना; सरासरी दर ६०० रुपये क्विंटलपर्यंत.परंतु देशात अन्य भागांत केळीची आवक वाढल्यास खानदेशी केळीसमोर स्पर्धा असते. परिणामी, दर कमी होतात. गणेशोत्सव व नवरात्रीच्या काळात असाच फटका खानदेशी केळीस अन्य राज्यांतील केळीच्या वाढत्या आवकेने बसला होता. परंतु या उन्हाळ्याच्या कालावधीत देशात अन्य भागात केळी आवक अल्प आहे. उत्तर प्रदेश, बिहार भागांतही आवक नसल्याची स्थिती आहे. यामुळे उत्तरेकडील म्हणजेच पंजाब, हरियाना, दिल्ली, काश्मीर, उत्तर प्रदेशातील खरेदीदारांना खानदेशातील केळीवर अवलंबून राहावे लागत आहे..आंबा, अन्य फळे महागआंबा आवक बाजारात कमी आहे. द्राक्षे व अन्य रसाळ फळे महाग आहेत. मागील आठ ते १० दिवसांत खानदेशसह मध्य प्रदेशात कलिंगड आवकेत मोठी घट झाली आहे. यामुळे केळीस उठाव आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली..Banana Price Drop: केळीच्या दरात सलग घसरण; उच्च दर्जाचा माल ८५० रुपयांवर.सुधारणांचा कलकेळी दर १८ ते २० दिवसांपूर्वी किमान ३०० व कमाल ६०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल, असे होते. त्यात मागील काही दिवसांत हळूहळू सुधारणा झाली. अन्य राज्यांतील केळीची आवक कमी दिसत असल्याने खानदेशातून केळीस उठाव वाढू लागला. यानंतर दर ४०० ते ११००, १२०० व १३०० रुपये प्रति क्विंटल, असे अनेक दिवस होते. त्यात मागील काही दिवसांत आणखी चांगली सुधारणा झाली असून, किमान दर ५००, ६०० व कमाल दर १५००, १८०० ते २१०० रुपये प्रति क्विंटल, असे आहेत. काश्मीर व आखातात पाठवणुकीच्या केळीचे दर २००० ते २१०० रुपये प्रति क्विंटल, असे आहेत..निर्यातही सुरूआखातात इराण वगळता अन्य भागांत केळीची निर्यात मागील १० ते १२ दिवसांत सुरू झाली आहे. सध्या खानदेशातून रोज १४ ते १६ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात आखातात होत आहे. ही निर्यात इराक, बहरीन, सौदी अरेबिया आदी भागांत होत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या प्रति दिन सरासरी २४० ते २४५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे..तर धुळे व नंदुरबारातील शहादा, तळोदा भागांत रोज ५० ते ५५ ट्रक केळी आवक होत आहे. रावेर, यावल व मुक्ताईनगर भागांत निर्यातक्षम केळी आहे. नंदुरबारात शहादा भागात निर्यातक्षम केळी असून, रावेर, यावल भागातून रोज १२ ते १३ कंटेनर व शहादा भागातून रोज चार ते पाच कंटेनर केळी आखातात जात आहे. राज्यात सोलापुरातूनही केळी निर्यात सुरू असून, तेथूनही रोज २८ ते ३० कंटेनर केळीची निर्यात होत असल्याची माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.