Jalgaon News: खानदेशात मागील काही दिवसांत केळीच्या दरात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली आहे. किमान दर १००० आणि कमाल दर १६०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. .निर्यातीच्या केळीचे दरही यामुळे काहीसे कमी झाल्याची माहिती आहे. खानदेशात केळी आवक स्थिर आहे. त्यात दर कमी झाल्याने केळी उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे. खानदेशात सध्या आगाप मृग बहर केळी बागांमधून केळीची आवक होत आहे. पिलबाग केळीतूनही आवक होत आहे. .Banana Rate: केळी दर पोहोचला १७०० रुपये क्विंटलवर.रोज ४५ ते ४८ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवक स्थिर आहे. धुळ्यातील शिरपूर भागातून यंदा आवक रोडावली आहे. कारण तेथे केळीची वादळात २७ जानेवारी रोजी मोठी हानी झाली आहे..Banana Farmers: केळी पीकविमाधारक नुकसान भरपाईपासून वंचित.सध्या नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार व अक्कलकुवा भागांसह जळगावातील चोपडा, रावेर, यावल, जळगाव या भागांत केळीची आवक होत आहे. केळी दर मध्यंतरी २४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोचले होते. महाशिवरात्रीला केळीला उच्चांकी २४०० रुपये दर अनेक भागांत मिळाला होता. महाशिवरात्रीनंतर हळूहळू केळी दर कमी झाले. आवक कमी असताना दर कमी झाल्याचा मुद्दा उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत..मध्य प्रदेशात दर स्थिर : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीतही केळीची आवक रोज १८ ते २० ट्रक (एक ट्रक १६ ते २२ टन क्षमता) एवढीच आहे. तेथेही कमाल दर १८०० रुपये प्रति क्विंटल, एवढाच आहे. दर्जेदार केळी खानदेशात आहे. पण दर ऐन मागणीच्या कालावधीत कमी झाल्याने शेतकरी वित्तीय संकटात सापडले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.