Jalgaon News: खानदेशात मागील काही दिवसांत केळीच्या आवकेत घट झाली आहे. परंतु दर अस्थिर असून, व्यापारी लॉबी ऐन सणासुदीच्या कालावधीत दर पाडत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने केळी दर निश्चिती, त्यांची अंमलबजावणी या बाबत चालढकल, दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे..खानदेशात केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते. खानदेशात दर्जेदार केळी काढणीवर आहे. पण आवक कमी होत आहे. आवकेत मागील दोन दिवसांत सुमारे २५ ते ३० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी घट झाली आहे..Banana Cluster : ‘बनाना क्लस्टर’मध्ये गुंतवणुकीची संधी.मध्य प्रदेशातील आवकेतही होतेय घटमध्य प्रदेशातही आवक कमी झाली आहे. तेथे सध्या रोज २४५ ते २४७ ट्रक (एक ट्रक दोन ते १० टन क्षमता) एवढी केळी आवक आहे. तेथे केळीचे लिलाव होत आहेत. कमी दर्जाची केळी तेथे अधिक येत आहे. तेथे केळी दरात मागील पाच ते सहा दिवसांत काहीशी सुधारणा झाली आहे. आवकेत तेथे घट होऊनही दरात मोठी सुधारणा मात्र नाही..Banana Rate : केळी दरप्रश्नी बऱ्हाणपूर-जळगाव प्रशासनाची बैठक.जळगाव जिल्ह्यात दर निश्चिती नाहीचदुसरीकडे खानदेशात बऱ्हाणपुरातील दरांनुसार केळीची खरेदी केली जात असून, तेथील दरांबाबतच्या घडामोडींचे दाखले देऊन खानदेशातही खरेदीदार कमी दरात केळीची खरेदी करीत आहेत..यामुळे रावेर, चोपडा येथे केळीचे लिलाव करून दर जाहीर करावेत व त्यानुसार केळीची शिवार खरेदी करावी, त्याशिवाय केळी उत्पादकांना न्याय मिळणार नाही. कारण केळी लागवड व उत्पादनात जळगाव जिल्हा देशात अग्रेसर आहे. यामुळे केळीची दर निश्चिती जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या मध्यस्थीने केली जावी, असा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.