ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट रिसर्च’ येथील तीन संशोधकांनी जागतिक तापमान वाढीच्या प्रक्रियेचा वेग रोखण्यासाठी काय करता येईल, या संदर्भात अभ्यास केला आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रारूपानुसार राबवलेल्या बदलांचे होणारे परिणाम तपासले आहे. त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल नेचर कम्युनिकेशन्स’ मध्ये प्रकाशित झाले आहेत. मानवतेसमोरील आव्हानांची यादी केली तर त्यामध्ये जागतिक तापमान वाढ हे संकट फार वरच्या क्रमांकावर येईल, याबाबत शास्त्रज्ञांच्या मनामध्ये शंका नाही. औद्योगिकीकरणाने वेग घेतल्यानंतर सुरू झालेल्या या प्रक्रियेचा वेग पुढे वाढतच गेला आहे. भविष्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे अनेक वनस्पती, सजीव प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. त्याच प्रमाणे ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळून सागरी पातळीत वाढ झाल्याने अनेक बेटे आणि किनाऱ्यावरील भाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. सामान्यतः तापमान वाढ रोखण्यासाठी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची कल्पना मांडली जाते. मात्र, त्या प्रक्रिया राबवूनही आपली पृथ्वी थंड करण्यास सुरुवात होण्यासही काही दशकांचा कालावधी लागू शकतो. वातावरणाचे पॅटर्न (त्याला इंग्रजीमध्ये क्लायमेंट इनर्शिया असे म्हणतात) बदलण्यासाठी अत्यंत खोलवर विश्लेषण करून या हरितगृह वायूंचे कमी करण्याचे नेमके प्रमाण ठरवावे लागणार आहे. हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण वेगवेगळ्या पातळीपर्यंत कमी केल्यानंतर होणारे परिणाम किंवा त्या उत्सर्जनाचे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांचे उपलब्ध वेगवेगळ्या वातावरणीय प्रारूपांवर या संशोधकांना काम केले आहे.
प्रक्रियेचा वेग आणि सकारात्मक परिणाम दिसण्यास लागणारा काळ
संपूर्ण मानवजात म्हणून विचार आवश्यक
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.