केंद्र सरकारने सरकारी खरेदीचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी पंजाब सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारी खरेदी केंद्रावर आर्द्रतेचे प्रमाण ६ टक्क्यांनी कमी असले तरीही हमीभावाने खरेदी करण्यात येते.
उष्णतेची लाट, कोरड्या हवेच्या माऱ्यामुळे यंदा पिकांमधील आर्द्रतेचे प्रमाण घटले आहे.केंद्र सरकारच्या पाच पथकांनी राज्यातील पिकांची पाहणी केली. पिकांचे नमुने संकलित करण्यात आले आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हवामान पिकाला अनुकल होते. मात्र पीक शेवटच्या टप्प्यात असताना अचानक तापमान वाढले. पिकांमधील आर्द्रतेचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
उत्पादकता घटल्याने आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी सरकारी खरेदीचे निकष शिथिल करण्यात यावेत, अशी विनंती राज्य सरकारने केंद्राला केली आहे.
प्रयोग शाळांमधील तपासणीनंतर याबाबतचा अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे. त्यानंतरच या पिकाला हमीभावाचा लाभ देताना नियम शिथिल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.