नाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात नवी ओळख तयार करीत आहे. गावातील सर्व घटक गट-तट, भाऊबंदकी, जाती-धर्म विसरून गावाच्या प्रगतीसाठी एकत्र झटतात. स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगारर्निर्मिती अशा विविध क्षेत्रांत गावाने विधायक उपक्रम हाती घेतले आहेत. याच धर्तीवर ‘स्मार्ट ग्राम’ अशी ओळखही नावारूपास आली. ग्रामस्थांची वज्रमूठ गोदावरी काठी असल्याने १९६९ सालच्या महापुरात गाव विस्थापित झाले. स्आपलं गाव इतरांपेक्षा वेगळं असावं, शक्य तेवढ्या पूरक सुविधा गावात असाव्यात या ध्येयाने पछाडून सर्वांनी कामास सुरवात केली. ग्रामपंचायतीला सक्षम महिला नेतृत्व लाभले आहे. सरपंच सौ. सोनाली राजेंद्र राजोळे, उपसरपंच सौ. मीरा नवनाथ पिठे या गावाचा कारभार पारदर्शकपणे हाताळतात. ग्रामपालिका सदस्य, ग्रामसेवक प्रमोद खैरनार यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभते. होणाऱ्या प्रत्येक ग्रामसभेत महिला आपली मते मांडतात. स्वच्छ पाणी व आरोग्य गावाच्या सभोवताली मुबलक पाणी उपलब्ध आहे. पण सर्वांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जलसुराज योजना राबविली आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र नळजोडणी असून, २.२५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या दोन स्वतंत्र टाक्या आहेत. निर्जंतुकीकरण प्रक्रिया करून प्रत्येक कुटुंबाला पाणी वितरित होते. यामुळे गेल्या पाच वर्षांत कुठलीही रोगराई गावात झालेली नाही. त्यामुळे आरोग्याचा स्तर उंचावला असून, राज्य शासनाने ग्रामपालिकेस ‘चंदेरी कार्ड’ सन्मान प्रदान केला आहे. पुढचा टप्पा म्हणजे ग्रामपालिकेने एका खासगी कंपनीकडून ‘सीएसआर’ फंड मिळविला आहे. यातून ‘आरओ’ युनिट उभारले जात आहे. यातून प्रत्येकाला पाच रुपयांमध्ये २० लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. पडीक जमिनीवर वृक्षसंपदा हरित संपन्न गावाच्या निर्मितीसाठी गाव सदैव प्रयत्नशील आहे. गावकऱ्यांनी पडीक जमिनीवर २० हजार झाडांची लागवड केली आहे. यात चिंच, जांभूळ, पेरू, आंबा, बदाम, सिल्व्हर ओक व बांबू यांची लागवड केली आहे. पुढील काळात पर्यावरण संवर्धनासह झाडांपासून आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे. गावात लोकसंख्येच्या चार पट वृक्षारोपण करण्यात आले असून, प्रत्येक घरासमोर किमान एक झाड लावण्याचा संकल्प केला आहे. ‘एक व्यक्ती - एक झाड’ अशी संकल्पना गावाने राबविली आहे. गावाबाहेर पडीक रानावर ‘आमराई’ साकारली आहे. दारूबंदीचा ठराव गावात दारूविक्रीवर बंदी आणण्यासाठी तत्कालीन सरपंच खंडू माधव बोडके व सौ. मनीषा प्रवीण राजोळे यांनी प्रयत्न केले. दारूविक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा देत दारूबंदीचा ठराव ग्रामसभेने संमत केला आहे. सुविधायुक्त ग्रामपालिका कार्यालय करंजगाव ग्रामपालिकेचे कार्यालय सर्व सुविधांनी युक्त आहे. सर्व कामे संगणकीकृत होतात. दैनंदिन हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्र बसविले आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, बैठकीसाठी सभागृह तसेच ग्रामस्थांसाठी छोटे प्रतीक्षालय आहे. कार्यालय सीसीटीव्ही कॅमेरा निगराणीखाली आहे. कार्यालयातून दिला जाणारा प्रत्येक दाखला संगणकीकृत असतो. भ्रष्टाचार निर्मूलन प्रकरणे, लोकशाही दिन, ग्रामस्थांची सनद, वृक्ष लागवड, दवंडी व मासिक आणि ग्रामसभेच्या नोंदीसाठी विषयनिहाय नोंदवह्या ठेवल्या जातात. अर्थसंकल्पही सादर होतो. सामाजिक कार्यक्रमात पुढाकार गावात विविध जातिधर्मांचे लोक राहतात. त्यामुळे दिंडी सोहळे, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचने, वैचारिक व्याख्याने यांचे आयोजन होते. ग्रामपालिका मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करते. उत्पन्नातील ५ टक्के टक्के वाटा अपंगांसाठी निधी म्हणून वापरला जातो. ऐतिहासिक गाव करंजगावच्या उत्तरेला गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. जागतिक कामगार चळवळीच्या इतिहासात योगदान देणाऱ्या कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचे जन्मगाव म्हणून करंजगाव ओळखले जाते. गोदाकाठी रामायणाच्या आख्यायिकेत गावाचा उल्लेख होतो. या गावात प्राचीन सिद्धेश्वराचे शिवमंदिर आहे. या शिवमंदिरास तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग तसेच गावास पर्यटन स्थळ म्हणून ‘क’ वर्ग दर्जा आहे. गावात खंडोबाचे मंदिर असून, त्यास प्रतीजेजुरीचा मान आहे. गौतम ऋषींचे पुत्र करंज ऋषी यांची समाधी आहे. यावरून गावाचे नाव ‘करंजगाव’ असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पेशवेकालीन गढी, प्राचीन मंदिरे व नदीपात्रातील शिवालये इतिहासाची साक्ष देतात. स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन
गाव सुंदर व स्वच्छ होण्यासाठी कामे
डिजिटल शिक्षण व्यवस्था
महिला सबलीकरण
रोजगारनिर्मिती बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यसाठी ग्रामपालिकेकडून व्यावसायिक तत्त्वावर व्यापारी गाळ्यांची निर्मिती. गरजेनुसार ते भाडेतत्त्वावर उपलब्ध. त्यातील उत्पन्नातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपालिका प्रशासन प्रयत्नशील. युवक कल्याण
करंजगावची वैशिष्ट्ये
सन्मान
प्रतिक्रिया गावासाठी नावीन्यपूर्ण योजना, उपक्रम राबविण्यासाठी आमचा पुढाकार असतो. गाव स्वयंपूर्ण, सुंदर बनविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. गावाच्या विकासात ग्रामस्थ, सदस्य, ग्रामसेवक व शासन यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. - सौ. सोनाली राजेंद्र राजोळे - ९६८९७९७३१९ सरपंच, करंजगाव
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.