उन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, परंतु कोंबड्यांसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस हे योग्य तापमान आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त तापमान कोंबड्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम करते. वातावरणातील बदलामुळे कोंबड्यांमध्ये ताण निर्माण होतो, त्या उत्पादनक्षम राहू शकत नाहीत.
उन्हाळ्यातील तापमानवाढीमुळे योग्य नियोजनाची गरज असते. हे नियोजन जर व्यवस्थितरीत्या केले तर मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. उच्च तापमानामुळे वाढीच्या अवस्थेतील कोंबड्यांवर गंभीर परिणाम होतात. कोंबड्यांना घामग्रंथी (स्वेट ग्लॅड्स) नसतात. तसेच त्यांचे शरीर पिसांनी आच्छादलेले असल्यामुळे उन्हाळ्यात कोंबड्या अतिशय संवेदनशील असतात. कोंबड्यांच्या शरीराचे तापमान हे वातावरणाच्या तापमानापेक्षा अधिक असते. जेव्हा कोंबड्यांच्या शरीराचे तापमान व वातावरणातील तापमान समान होते, तेव्हा त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी उष्णता बाहेर टाकावी लागते. त्यासाठी त्यांच्या श्वसनाचा वेग वाढतो. कोंबड्या तोंडाची सतत उघडझाप करतात, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ होते. जेव्हा कोंबड्यांचा श्वसनाचा वेग वाढतो, तेव्हा त्यासोबतच त्यांच्या हृदयाच्या स्पंदनाचा वेगसुद्धा वाढतो. यामुळे रक्तदाब वाढतो. या सर्व क्रिया उष्णता शरीराबाहेर फेकण्याकरिता आपोआप घडतात. यासाठी ऊर्जेची गरज असते. ती गरज रक्तातील ग्लुकोजचा वापर करून भागविली जाते. पण जर या सर्व क्रिया जास्त वेळ चालू राहिल्या तर ऊर्जेच्या अभावी बंद पडतात व कोंबड्या उष्माघाताने मृत्युमुखी पडतात. हे टाळण्यासाठी कोंबड्यांचे दैनंदिन व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. उष्माघाताची लक्षणे
कोंबड्यांचे शवपरीक्षण
ः अंकितकुमार राठोड, ९७३०२८३२१२ ः डॉ. सतीश मनवर, ७२१८८४२८३३ (कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.