वाढत्या तापमानात जनावरांच्या आहार व्यवस्थापनामध्ये आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. यामध्ये हिरवा चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य आणि शुद्ध पाणी इ. घटकांचा समावेश होतो. पाण्याचे नियोजन
चाऱ्याचे व्यवस्थापन वाळलेला चारा कडबा व्यवस्थित साठवून ठेवावा. कडबा कुट्टी करूनच द्यावा. कुट्टीचे तुकडे एक इंच एवढे छोटे असावेत म्हणजे चारा वाया जाणार नाही. कुट्टीवर गूळपाणी आणि मीठ यांचे द्रावण करून शिंपडावे व ते एकत्र करून जनावरांना द्यावे, त्यामुळे खाद्यसेवनाचे प्रमाण वाढते. जनावरे चारा आवडीने खातात. -उपलब्ध असल्यास कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा एक भाग आणि वाळलेल्या चाऱ्याचे तीन भाग एकत्र करावेत. त्यामुळे चाराही पौष्टिक बनतो. अंबोवणाचे महत्त्व
वाढत्या तापमानामुळे जनावरांवर ताण येतो. म्हणून शरीराला आहारातून आवश्यक पोषणतत्त्वांचा पुरवठा होणे गरजेचे असते. उपलब्ध असलेली पेंड, ज्वारी किंवा गव्हाचा भरडा, डाळीचा भरडा एकत्र करून द्यावा. या व्यतिरिक्त दिवसातून दोन वेळेस १५-२० ग्रॅम खनिज व जीवनसत्त्वाचे मिश्रण द्यावे. ऊस आणि उसाचे वाढे
गव्हाच्या काडापासून पौष्टिक वैरण गव्हाचे काड साठवून ठेवावे, ते जाळू नये. गव्हाच्या काडावर चार टक्के युरियाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी आणि त्यापासून पौष्टिक चारा तयार करावा. संपर्क ः डॉ. सु. म. वानखेडे, ९४२०६५३५१५ (पशुपोषण व आहारशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.