भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय खाऱ्या पाण्यातील सजीव पालन संस्थेने चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर औद्योगिक संस्था (NIOT) यांच्या सहकार्यांने पिंजऱ्यातील मत्स्यपालनासंदर्भात प्रयोग सुरू केले असून, पहिल्या टप्प्यामध्ये सिबास माशांचे पालन करण्यात आले. यातून किनारावर्ती भागातील ग्रामीण भागामध्ये शाश्वत उत्पन्नांच्या व रोजगारांच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे. सागरी किनाऱ्याजवळील, खाडी प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनामुळे चांगले उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते. परदेशामध्ये सागरात जाळ्यामध्ये मत्स्यपालन मोठ्या प्रमाणात होत असले तरी भारतामध्ये अद्याप त्याने मूळ पकडलेले नाही. त्यासाठी चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर औद्योगिक संस्था (NIOT) यांच्या सहकार्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय खाऱ्या पाण्यातील सजीव पालन संस्था संशोधन करीत आहे. त्याअंतर्गत तमिळनाडू राज्यातील वेन्नागुपाट्टू (जि. कांचीपुरम) येथील बकिंगम खाडीमध्ये आशियाई सिबास माशांचे (लेट्स कैलकरीफर) जाळीदार पिंजऱ्यांमध्ये पालन करण्यात येत आहे. मत्स्यपालनासाठी आवश्यक पिंजऱ्यांचे आरेखन, निर्मिती, मत्स्यबीज वाढविण्यासाठी नर्सरी, मासेपालन यासाठी संशोधन होत आहे. प्रकल्पउभारणीसाठी त्रिस्तरीय प्रारूप तयार केले आहे. पिंजऱ्यातील मत्स्यपालनाचे त्रिस्तरीय तंत्र
शाश्वत उत्पन्नासह रोजगाराची निर्मिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.