जंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया जातो. जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते. शारीरिक ताण येतो. हे लक्षात घेऊन साधारणपणे योग्य मात्रेमध्ये पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच जंतनिर्मूलन करावे. जनावरांमध्ये जंत (कृमी) प्रादुर्भाव झाल्यास विशेषतः पावसाळा, हिवाळा ऋतूमध्ये ठरावीक कालांतराने जंतनाशकाची मात्रा दिली जाते. विशेषतः शेळी-मेंढीमध्ये सातत्याने जंतनिर्मूलन करावे लागते. कारण त्यांच्यामध्ये नियमितपणे जंताचा प्रादुर्भाव होतो. साधारणपणे योग्य मात्रेमध्ये पशुतज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसारच जंतनिर्मूलन करावे. यामुळे शेळी-मेंढीचे परजीवीपासून संरक्षण होऊन उत्पादन, पुनरुत्पादन व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही कारणाने जेव्हा जंतनाशकाची ठरावीक मात्रा देऊनदेखील ५० टक्के कमी जंतांवर त्या औषधाचा परिणाम होत नाही, म्हणजेच ते कृमी त्या जंतनाशकाला प्रतिकारक्षम बनतात. ही प्रतिकारक्षमता पुढील पिढीमध्ये प्रसारित होते. म्हणून जनावरांमध्ये जंतनिर्मूलन केले असले, तरी त्यांचा प्रादुर्भाव जाणवतो. जंतामधील प्रतिकारशक्ती त्यांच्या जनुकीय पातळीवर होते. जंतांच्या पुढील पिढ्यादेखील औषधास दाद देत नाहीत. ही एक अत्यंत घातक प्रक्रिया आहे. जंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया जातो. जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते. शारीरिक ताण येतो. जंतनाशकाप्रती प्रतिकारक्षमता तयार होण्याची कारणे
उपाययोजना आणि काळजी
जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असल्यास नियंत्रणाचे पर्याय
संपर्क डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४ डॉ. गजानन चिगुरे, ९७६१९६४९९९ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.