पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत भाजीपाला, डाळिंब, कापूस, ऊस अशी बहुविध पीक पद्धती पिंपळगाव जलाल (जि. नाशिक) येथील भोरकडे बंधूंनी फुलवली आहे. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत मुलांना मोठे केले. पुढे तिघे बंधू नोकरीत असताना आईने शेतीचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांना शेती करण्यासाठी घरी बोलवले. अनेक संघर्ष, अपयशे पचवित या बंधूंनी प्रयोगशील शेती घडवत आईचे स्वप्न पूर्ण केले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला हा दुष्काळी तालुका आहे. तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे पोपट भोरकडे यांची दहा एकर कोरडवाहू शेती होती. आपल्या तिन्ही मुलांच्या हाती शेतीची जबाबदारी येण्याच्या दरम्यानच त्यांचे निधन झाले. आईने हिंमतीने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. मुलांना मोठे केले. तिघे भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करू लागले. पण, नोकरीपेक्षाही शेतीच खऱ्या अर्थाने जगवेल हाच मंत्र आईने त्यांना दिला. मग तीनही मुले शेती करण्यासाठी घरी परतली. सुरवातीला अनेक अडचणी आल्या. पण, कुठेही न थांबता अपयशातून हे भाऊ मार्ग काढत राहिले. शेतीत उल्लेखनीय यश मिळवताना नियोजन, व्यवस्थापन व स्वतःमधील अनेक गुण त्यांना उपयोगी पडले. भोरकडे यांच्या शेती- प्रगतीची वैशिष्ट्ये
जमीन पुनर्भरण वडिलोपार्जित शेती खळगट, क्षारयुक्त, कोरडवाहू होती. मिळणारे उत्पन जेमतेम असे. मग खोदाईचे काम सुरू असताना पोयट्याची माती आणून शेतात पसरवली. जमिनीचा पोत सुधारला. कमवलेला पैसे शेतीत गुंतवून शेतीच्या प्रत्येक रुपयाचा मोल जाणले. त्याचे रूपांतर यशस्वी शेतीत केले. सिंचन सुविधा, पीक पद्धतीत बदल पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने जवळच अंतरावर विहीर खोदून पाणी पाइपलाइनद्वारे शेतात आणले. सन २०१२ मध्ये एकरात शेततळे उभारले. त्याची साठवणक्षमता सव्वा कोटी लिटर आहे. प्रत्येक थेंबाचा अचूक वापर हा शेती व्यवस्थापनाचा मुख्य गाभा आहे. प्रत्येक पिकाला किती पाणी आवश्यक आहे याचा अचूक बांधतात. एकूण शेतीत ९० टक्के ठिबकचा वापर केला आहे. पाण्याची बचत होण्यासाठी प्लॅस्टिक मल्चिंगसह पीक अवशेष, पालापाचोळा या जैविक मल्चिंगचा वापर होतो. सिंचनाची सुविधा झाल्यानंतर एक एकर डाळिंब बाग लावली. पीकपद्धतीत बदल करून किफायतशीर उत्पन्न घेण्यास सुरवात झाली. यातून मनोबल वाढले. प्रयोगशीलता रुजण्यास सुरवात झाली. दोडक्यातून सुधारले अर्थकारण
प्रतवारी महत्त्वाची कांदा, डाळिंब, वाल तसेच प्रत्येक मालाची प्रतवारी होते. त्यामुळे दरांत अधिक सुधारणा होते. त्यामुळे येवला, कोपरगाव व राहाता बाजारात व्यापाऱ्यांकडून अधिक मागणी होते. आज भोरकडे यांनी दोडका पिकात परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे ती त्यामुळेच. दुष्काळी स्थितीतही सध्याची पिके
अन्य उत्पादन-एकरी- (प्रातिनिधीक)
विक्री व्यवस्था
नव्या प्रयोगांचा अवलंब
ॲग्रोवनचे वाचक ॲग्रोवन हा भोरकडे यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामधील यशोगाथा, तंत्रज्ञानाची माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव यांचे ते आकलन करतात. आगामी योजना
संपर्क- श्रावण भोरकडे- ९९२२३०३२५४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.