pomegranate orchard
pomegranate orchard 
यशोगाथा

दर्जेदार डाळिंब उत्पादनाचे नियोजन

गणेश कोरे

डाळिंब फळ काढणी हंगाम संपल्यानंतर बागेचे पुढील हंगामाचे व्यवस्थापन सुरु झाले आहे. सध्या बागेत स्वच्छतेबरोबर सध्या शेणखत आणि  सुपर फॉस्फेटची मात्रा देऊन बेडची चाळणी करुन घेण्याचे काम सुरू आहे. झाडाची वाढ आणि जमिनीचा पोत लक्षात घेऊनच खतमात्रेचे नियोजन केले आहे. माझी आठ एकर डाळिंब लागवड आहे. यातील चार एक भगवा आणि चार एकर सुपर भगवा जातीची लागवड आहे. मला एकरी आठ ते दहा टनाचे उत्पादन मिळते. यंदाच्या वर्षी हवामान बदलाचा मोठा परिणाम डाळिंब उत्पादनावर झाला. नुकताच काढणी हंगाम संपला आहे. यावर्षी मला सर्व क्षेत्रातून २० टन उत्पादन मिळाले असून फळांची विक्री संपली आहे. यंदा कोरोना टाळेबंदीमुळे देखील दराचा फटका बसला.मला सरासरी ५० रुपये प्रति किलो दर मिळाला. यंदा हा दर किमान १०० रुपये अपेक्षित होता. 

फळ काढणी हंगाम संपल्यानंतर बागेचे पुढील हंगामाचे व्यवस्थापन सुरु झाले आहे. सध्या बागेत स्वच्छतेबरोबर सध्या प्रति झाड ३० किलो शेणखत आणि १०० ग्रॅम सुपर फॉस्फेटची मात्रा देऊन बेडची चाळणी करुन घेण्याचे काम सुरू आहे. झाडाची वाढ आणि जमिनीचा पोत लक्षात घेऊनच खतमात्रेचे नियोजन केले आहे. सध्याच्या काळातील बदलत्या हवामानात डाळिंबावर मावा,पांढरी माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणाच्यादृष्टीने कीडनाशकांच्या फवारणीचे नियोजन करणार आहे. हे काम साधारण टप्प्याटप्प्याने तीन महिने चालेल. 

  •  ऑगस्टमध्ये नव्या हंगामाची सुरुवात होईल. त्यादृष्टीने छाटणी, खरड छाटणी आणि पानगळीचे नियोजन करावे लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये फळधारणा अपेक्षित आहे. फळधारणा सुरु झाल्यावर विद्राव्य खतांबरोबरच फळांच्या फुगवणीसाठी वाढीच्या टप्यानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देण्याचे नियोजन असते.
  •  सध्या बेडची चाळणी झाल्यानंतर झाडांना लागलेली अनावश्‍यक फुटवे आणि कळ्यांची छाटणी करणार आहे. पुढील काळात वेळेवर पाऊस पडला नाही तर झाडांना भरपूर पाणी देत शिफारशीनुसार कॅल्शियम, बोरॉनची मात्रा देणार आहे. खोड किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक झाडाची तपासणी करत आहे. पावसाच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने देखील वेळेवर फवारणीचे नियोजन असते.  यानंतर तीन महिने झाडांच्या गरजेनुसार विद्राव्य खतांची मात्रा  दिली जाते.
  • ऑगस्टमध्ये साधारण जमिनीच्या पोतानुसार १५ दिवस ते १ महिना पाणी बंद करून, बागांना ताण देणार आहे. ताणानंतर खरड छाटणी करून, पावसाच्या अंदाजानुसार पाणी देण्याचे नियोजन सुरू होते.
  •  दोन महिन्यांनी बाग फुटायला लागल्यावर कळी धारणा होऊन ऑक्टोबर बहर सुरु होईल. यानंतर पीक वाढीच्या टप्यानुसार विद्राव्य खताची मात्रा देण्याचे नियोजन असते. दर्जेदार फळांच्या उत्पादनासाठी काटेकोर बागेचे व्यवस्थापन मी ठेवतो. गरजेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियोजनात बदल करण्यावर माझा भर असतो. 
  • - राजू कोंडे, ९२८४०५६०५९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT