सवना (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील गणेश चेलमीलवार यांनी पारंपरिक हंगामी पिकांना ऊस, केळी, मोसंबी या पिकांच्या सातत्यातून आर्थिक आधार दिला आहे. खेळत्या उत्पन्नासाठी टोमॅटो, काकडीसह टरबूज ही पिकेही फायदेशीर ठरतात. या पिकांना आवश्यक जमिनीची सुपीकता मिळवण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून शेणखताचा अधिक वापर, हिरवळीच्या खतासाठी धैंचासारख्या पिकांची लागवड ते करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सवना (ता. महागाव) येथील गणेश माधव चेलमीलवार यांच्याकडे वडिलोपार्जित ३० एकर शेती. त्यांच्या वडिलांनी किराणा दुकान चालवतानाच शेतीचा व्यासंगही जपला. पारंपरिक शेतीमध्ये ज्वारी, कपाशी, ऊस ही पिके होती. साधारणतः १९७५ सालीच दहावीनंतर गणेश यांनी शेतीमध्ये लक्ष घातले होते. २००७ मध्ये वडिलांच्या निधनानंतर पूर्ण सूत्रे त्यांच्या हाती आली. केळी लागवडीत सातत्य :
भाजीपाला लागवडीचा प्रयोग ः दरवर्षी दीड एकर क्षेत्र दोडकी, काकडी, टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकांसाठी असते. त्यातून रोख रक्कम खेळती राहत असल्याने ही पिके उपयुक्त ठरतात. भाजीपाला विक्रीसाठी पुसद बाजारपेठेला त्यांची पसंती आहे. मात्र, या वर्षी पाण्याअभावी भाजीपाला पिके घेऊ शकले नसल्याचे गणेश यांनी सांगितले. टरबुजातून भरभराट ः जानेवारी २०१५ पासून मल्चिंगवर टरबूज पीक घेतात. तीन एकरमधून ५५ टन टरबूज उत्पादन मिळाले. त्याला ६ रुपये २५ पैसे प्रति किलो असा दर जागेवरच मिळाला. टरबूज व्यवस्थापनाला एकरी ५० हजार रुपये खर्च झाला. ऊस पिकातही सातत्य ः
फळपिकाचा जपला वारसा ः दोन एकर क्षेत्रामध्ये दहा वर्षे जुनी मोसंबी लागवड आहे. दोनशे झाडे आहेत. बाग जुनी असली तरी वेळेवर छाटणी, रोग किडीसाठी फवारणी, खोडांना बोर्डो पेस्ट लावणे, फळमाशीसाठी सापळ्यांचा वापर याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. यासाठी सामान्यत: एकरी १० हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. संपूर्ण बाग व्यापाऱ्यांना देतात. त्यातून दोन एकरमधून गेल्या वर्षी एक लाख रुपये मिळाले होते. या वर्षी दीड लाख रुपयांची मागणी झाली आहे. हिरवळीच्या खताकरिता धैंचाचा पर्याय ः पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेणखतांचा वापर महत्त्वाचा आहे. मात्र, चारा व पाणीटंचाईमुळे गेल्या काही वर्षांमध्ये जनावरांचे प्रमाण कमी होत असल्याने शेणखताची उपलब्धताही कमी झाली आहे. त्यामुळे गणेश यांनी शेणखताइतकेच हिरवळीच्या धैंचा पिकाला प्राधान्य दिले. गेली तीन वर्षे सलग हिरवळीचे पिके घेत आहेत. आंतरमशागतीनंतर नुसते बियाणे फेकूनही धैंचाची उगवण होते. खरिपासाठी पीक नियोजन झाल्यानंतर धैंचा लागवड करतात. लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांत पीक फुलोरा अवस्थेत येते. या काळात ते जमिनीत गाडले जाते.
शेतीच्याच सेवेत राहण्याचा प्रयत्न ः
अनुकरण करण्यासाखे ...
संपर्क ःगणेश चेलमीलवार, 9763757597
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.