Pune News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा फटका किनारी भागाला बसत आहे. हे चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारी भागाला धडकण्याची आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. तर उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढली.
राज्यातील किमान तापमान हंगामात ८ अंशांवर आधीच पोचले. आजही राज्यातील तीन ठिकाणी ९ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. किमान तापमानातील घट कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्यातील तापमान बहुतांशी ठिकाणी घसरले आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये ८.९ अंश सेल्सिअस तापमानाची आज नोंद झाली. राज्यातील इतर भागातही किमान तापमानाचा पारा घसरत आहे.
राज्यातील सर्वच भागात किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. तर पुढील ४ दिवस राज्यातील तापमानातील घट कायम राहू शकते. म्हणजेच राज्यातील थंडी कायम राहण्यास पोषक वातावरण आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात 'फेंगल' चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळ आज तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने चेन्नईसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला. चक्रीवादळामुळे किनारी भागात जोरदार वारे, तसेच मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचीही शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.