उंद्री येथील औजारे निर्मात्यांनी खरीप हंगाम लक्षात घेता विविध औजारांची निर्मिती केली आहे.
उंद्री येथील औजारे निर्मात्यांनी खरीप हंगाम लक्षात घेता विविध औजारांची निर्मिती केली आहे.  
टेक्नोवन

कृषी अवजार निर्मात्यांना चांगल्या हंगामाची अपेक्षा

टीम अॅग्रोवन

गेल्या काळात झालेली नोटाबंदी, त्यानंतर लागू झालेली जीएसटी यासारख्या धोरणांचा कृषी यंत्रनिर्मात्यांना मोठा फटका सहन करावा लागला. गेले दोन हंगाम हा व्यवसाय मंदीच्या सावटाखाली अाला होता. किमान अागामी हंगाम तरी अाता यातून बाहेर काढेल, अशी अपेक्षा हे यंत्र निर्माते व्यक्त करीत अाहेत. नागपूर -अौरंगाबाद मार्गाने जाताना उंद्री (ता. चिखली) नावाचे गाव लागते. हे गाव कृषी यंत्रनिर्मितीसाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेशात लौकिकास अालेले अाहे. गेली २५ ते ३० वर्षे हा व्यवसाय या गावात टिकून अाहे. काळानुरूप त्याचा सातत्याने विस्तारही झाला. अागामी हंगामासाठी सध्या शेतकऱ्यांची जशी हालचाल सुरू झाली, तशीच लगबग या गावात यंत्रनिर्मिती करणाऱ्यांमध्ये अाहे. हंगामाच्या दृष्टीने ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्र, नांगर, रोटाव्हेटर, तसेच बैलांच्या साह्याने काम करू शकणारी अवजारे बनविले जातात. या ठिकाणची अवजारे सर्वत्र प्रसारित होत असतात. गेल्या काही वर्षांत शेतीत जसे यांत्रिकिकरण वाढले, तशी या यंत्रचलित अवजारांच्या मागणीत वाढच झाली. शिवाय शासनाने उन्नत शेती अभियानातून यांत्रिकरणाला प्रोत्साहन देत ट्रॅकर व इतर अवजारांचे अनुदानावर वाटप केल्याचा फायदा या व्यवसायाला होत अाहे. नोटाबंदीनंतर या व्यवसायाची मोठी हानी झाली. शेतीला लागणाऱ्या अवजारांची मागणीच घटली होती. नंतरच्या काळात जीएसटी लागू झाल्याने दरातही वाढ झाली. याचा सारासार परिणाम या व्यवसायाने भोगला. लोखंडाच्या दरात होणारी वाढ हीसुद्धा अवजारांच्या किंमतवाढीला कारणीभूत ठरत असते.  अाता परिस्थितीत थोडी सुधारणा दिसून येत असल्याने या अवजारांची विक्री वाढेल असे व्यावसायिकांना वाटते अाहे. उंद्रीसारख्या गावात ३० ते ३५ निर्मात्यांकडे अवजारे, यंत्र बनविण्याचे काम सुरू अाहे. येणाऱ्या हंगामात शेतकऱ्याला जसे चांगले पीकपाणी येईल अशी अपेक्षा राहते, तशीच अाशा शेतकरी अवजारे विकत घेण्यासाठी

रोजगारनिर्मिती करणारा उद्योग शेती अाधारित यंत्र-अवजारे बनविणारा हा उद्योग उंद्री गावात सर्वाधिक फोफावला. २५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उद्योगांची संख्या सध्या ३० ते ३५ दरम्यान पोचली. या माध्यमातून ३०० ते ३५० जणांना वर्षभर रोजगार मिळाला. असंख्य शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या हातांना यातून काम मिळाले. सध्या उंद्री व लगतच्या काही गावांतील बेरोजगारांची संख्या कमी करण्यास या उद्योगाने मोठा हातभार लावला अाहे.

प्रतिक्रिया : मागील काही हंगामात शेतीला लागणाऱ्या अवजारांना कमी मागणी होती. त्याचे चटके या उद्योगाने भोगले. यंदा किमान ही परिस्थिती बदलेल असे वाटते अाहे. विविध यंत्र, अवजारे बनविण्यासाठी कारागिरांचे हात दिवसरात्र झटत अाहेत. चांगले दिवस यावेत हीच अपेक्षा. अप्पाजी गुंजकर,अवजारे निर्माता, उंद्री, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT