सांगली ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून (Employment Guarantee Scheme) (रोहयो) जिल्ह्यात ६८० हेक्टरवर फळबाग लागवड (Orchard Plantation) झाली आहे. राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या ४२ टक्के लागवड झालेली आहे. आतापर्यंत कृषी विभागाने (Agriculture Department) निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार पाच जिल्ह्यांनी आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक लागवड केली आहे.
पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळावे आणि रोजगारही उपलब्ध होण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड केली जाते. प्रत्येक कृषी सहायकाला उद्दिष्ट निश्चित करून दिल्याने मार्चअखेर कृषी विभागाने ठरलेल्या उद्दिष्टानुसार फळबाग लागवड होईल, असा विश्वास कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
यंदा फळबाग लागवडीच्या सुधारित मापदंडानुसार अंदाजपत्रके तयार केली आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विदेशी फळे, फुले, मसाला लागवड, आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन समाविष्ट आहे.
घटकनिहाय अनुदान असे ः
घटक- फळे लागवड, कट फ्लॉवर्स, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर, घटक- इतर शेतकरी, खर्चमर्यादा- एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार प्रतिहेक्टर, कंदवर्गीय फुले, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा- दीड लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार प्रतिहेक्टर राहणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.