शेतकरी कर्जमाफीत राज्य शासनाने घातली आणखी १६ मुद्यांची भर
शेतकरी कर्जमाफीत राज्य शासनाने घातली आणखी १६ मुद्यांची भर 
मुख्य बातम्या

कर्जमाफी योजनेला पुन्हा निकषांचा अडसर

Gopal Hage

राज्य शासनाने घातली आणखी १६ मुद्यांची भर अकोला : अाधीच विविध निकषांमुळे राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी गाजत असताना त्यात अाणखी १६ नवीन मुद्दे समाविष्ट करण्यात अाले अाहेत. यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणे अाणखीच दुरापास्त होईल, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होऊ लागली अाहे. 

राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली तेव्हापासून वेळोवेळी निकष बदलण्यात अाले. अाता तिसऱ्यांदा निकष बदलल्याची चर्चा सुरू झाली अाहे. या नव्या बदलांमध्ये तब्बल १६ निकष समाविष्ट केले असल्याने कर्जमाफीचा लाभ मिळणे अाणखीच किचकट बनले अाहे. शिवाय एवढे निकष पार करून ज्या शेतकऱ्यांचा अर्ज पात्र ठरेल तो अाता नशिबवानच समजला पाहिजे, अशा उपहासात्मक प्रतिक्रियासुद्धा दिल्या जात अाहेत. राज्य शासनाने कर्जमाफीच्या पूर्वीच्या निकषांमध्ये ज्या १६ मुद्यांची भर घातली. त्यात कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्याकडे ८४ महिन्यांपूर्वीची जुनी थकबाकी नसली पाहिजे. शिवाय जमीन खरेदीसाठी घेतलेले कर्ज, वेअरहाउस, शीतगृह, माती परीक्षण, रोपवाटिका, बीज प्रक्रिया, अन्न प्रक्रिया आदींसाठी घेतलेले कर्ज, कृषी चिकित्सा अाणि केंद्र, अन्न प्रक्रिया, कृषी कर्जपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, मायक्रो फायनान्स, सावकाराचे कर्ज, गृहकर्ज, करार शेती, मोटारकार, दुचाकी अादींसाठी घेतलेल्या कर्जाचा यात समावेश अाहे. अादेशांबाबत माहिती नाही कर्जमाफीच्या निकषांमधील वाढीबाबत उपनिबंधक, अग्रणी बँक तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काहीच माहिती नसल्याचे उत्तर मिळाले. सोमवारी याबाबत माहिती देता येईल, असे अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. शिवाय कुठेही याची वाच्यता होणार नाही याबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचेही समोर अाले अाहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT